सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि इतर संस्थांतील कार्यकर्ते यांच्यातील भेद

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते ईश्‍वरप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी प्रयत्नरत असतात; म्हणून त्यांना इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांप्रमाणे कोणत्याही पदाची अपेक्षा नसते. – डॉ. आठवले

शाळेतच प्रत्येक गोष्ट साधना म्हणून करायला शिकवले असते, तर देशाची दुर्दशा झाली नसती !

कोणालाच त्याचे काम, व्यवसाय साधना म्हणून करायला न शिकवल्याने कामगारांपासून आधुनिक वैद्य (डॉक्टर), वकील इत्यादींपर्यंत सर्वच अधिक पैसे कसे मिळवता येतील ?, याचाच विचार करतात. साधना म्हणून प्रत्येक गोष्ट करायला शाळेतच शिकवले असते, तर देशाची दुर्दशा झाली नसती. – (प.पू.) डॉ. आठवले

भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे, हे सांगण्यासाठी पाश्‍चात्त्यांचे प्रशस्तीपत्र नको !

पारतंत्र्यामुळे आमच्यात न्यूनगंड निर्माण झाल्यामुळेच आता पाश्‍चात्त्यांनी प्रशस्तीपत्र दिल्याविना आम्हाला आमचे सिद्धांत शिरोधार्य वाटत नाहीत. सुदैवाने आता पाश्‍चात्त्य लोकच आमचे पातंजल योगशास्त्रासारखे शास्त्र अभ्यासू लागले आहेत. पाश्‍चात्त्य लोक कितीही भौतिकवादी असले, तरी जिज्ञासू आहेत. त्यांच्या स्तुती-निंदेची अपेक्षा न करता आम्ही आपल्या संस्कृतीचा विचार केला पाहिजे आणि त्याचे आचरण केले पाहिजे. – सुप्रसिद्ध कायदेपंडित श्री. रजनीकांत … Read more

फटाक्यांच्या कारखान्यांवर बंदी न घालणारे राज्यकर्ते जनहिताच्या संदर्भात किती उत्तरदायीशून्य आहेत, हे लक्षात घ्या !

फटाक्यांच्या कारखान्यांवर बंदी न घालणारे राज्यकर्ते जनहिताच्या संदर्भात किती उत्तरदायीशून्य आहेत, हे लक्षात घ्या ! : स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे राज्यकर्ते जनहितकारी नसल्याने फटाके वाजवू नका, यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीला अनेक वर्षे मोहिम राबवावी लागत आहे. एखादे सुबुद्ध सरकार असते, तर त्याने मुळाशी जाऊन फटाक्यांच्या कारखान्यांवर बंदी घातली असती. हिंदु राष्ट्रात हे साध्य होईल. – प.पू. डॉ. … Read more

‘हिंदुत्ववादी संघटनाच सर्व काही करतील’, अशी अपेक्षा न करता प्रत्येक हिंदूने क्रियाशील होणे आवश्यक !

एका डॉक्टरांनी तेथील एका निराश्रित हिंदु महिलेची करुण कहाणी सांगून तिच्यासाठी संघ काय करील ? असा प्रश्न केला. त्यावर डॉ. हेडगेवार उत्तरले, ‘सध्या संघ काहीही करू शकत नाही. मात्र तुम्ही ते काम अंगावर घेत असाल, तर मी व्यक्तीशः साहाय्य देण्यास तयार आहे’. मग काय करायचा तुमचा संघ ? अशा शब्दांत त्या प्रश्न् विचारणाऱ्या गृहस्थाने असमाधान … Read more

अजेय राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक घटक

क्षात्रतेज असलेले सैनिकी सामर्थ्य आणि प्रखर राष्ट्रभक्तीने भारलेला समाज या दोन्हींमुळेच अजेय राष्ट्र निर्माण होते ! – सरसंघचालक प.पू, गोळवलकर गुरुजी

मोडकळीस येत असलेली कुटुंबव्यवस्था

हल्ली एकत्र कुटुंब हा शब्द भूतकाळातील आणि अशक्य असा वाटतो. पूर्वीच्या एकत्र कुटुंबात केवळ सख्खीच नाही, तर चुलत भावंडेही एकत्र रहात. काही एकत्र कुटुंबांत ४० – ५० व्यक्तीही असत. बर्‍याच कुटुंबांतील वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यात येत आहे. घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे. काही वर्षांनी तर कुटुंब हा शब्दही उरणार नाही कि काय ?, अशी स्थिती निर्माण … Read more

हिंदु राष्ट्राची स्थापना कोण करू शकतील ?

हिंदु राष्ट्राची स्थापना स्वार्थी राजकारणी नाही, तर सर्वस्वाचा त्याग करणारे राष्ट्र आणि धर्मप्रेमी, तसेच साधकच करू शकतील ! – (प.पू) डॉ. आठवले (७.५.२०१४) राजकारणी पैसा, पद देऊ, असे सांगतात, तर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती सर्वस्वाचा त्याग करा, म्हणजे ईश्‍वरप्राप्ती होईल, असे सांगतात. – (प.पू) डॉ. आठवले (४.१२.२०१४)

खर्‍या हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी एक-दोन पिढ्या लागणार असल्याचे कारण

मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात, हेच त्यांचे शिक्षण योग्य नसल्याचे एकमेव कारण नाही. घरी होणारी भांडणे, तसेच दैनिकांत आणि दूरचित्रवाहिन्यांवर येणार्‍या स्वैराचार, भ्रष्टाचार, जात्यंधता, अपहरण, बलात्कार, खून इत्यादी बातम्या यांमुळेही त्यांच्यावर अनिष्ट संस्कार होतात. पुढे अशा बातम्यांचे त्यांना काही वाटेनासे होते आणि काही काळानंतर त्यांच्यातील काहीजण या गोष्टी स्वतःही करू लागतात. मुलांवर अनिष्ट संस्कार होऊ … Read more

जशी वास्तू आपली नसून वास्तूदेवतेची असते, तसेच सर्व स्थानदेवता, ग्रामदेवता इत्यादी देवतांचे असते !

जिथे आपल्या देहावरच आपला ताबा नसतो, तेथे आपल्या वस्तू, वास्तू इत्यादींना आपले म्हणायचा आपल्याला काय अधिकार ? आपण ज्या वास्तूत रहातो, ती वास्तू आपल्याला आपली वाटते; पण ती वास्तू आपली नसून वास्तूदेवतेची असते; कारण त्या जागी आपण पुढे असू किंवा नसू, तरी देवता मात्र तेथेच असते. राजकारण्यांनाही वाटते, हा मतदारसंघ माझा. हे गाव माझे. हे … Read more