मोहक विषवेली एक दिवस सनातन वृक्षच उन्मळून टाकेल की काय, असे भय निर्माण झाले असणे

सनातन हिंदु धर्म संस्कृतीच्या अत्यंत जुनाट सनातन वृक्षाला ही विषवेली बिलगली असून; ती इतकी वाढली आहे की, तो वृक्षच आता दिसेनासा झाला आहे. ती मोहक विषवेली आता एक दिवस तो सनातन वृक्षच उन्मळून टाकेल की काय ?, असे भय निर्माण झाले आहे. हिंदु जीवन ही चीज हिंदूनाच दुर्मिळ झाली आहे. हिंदुत्वाची बात दूरची ! आणि … Read more

मक्सम्यूलरने हिंदु धर्माचे मूळ असलेल्या वेदांनाच उखडून टाकणे

ऋग्वेदाच्या अनुवादाविषयी मॅक्सम्यूलर हा पाश्‍चिमात्त्य विचारवंत आपल्या पत्नीला लिहिलेल्या पत्रात म्हणतो, वेद हेच हिंदूंच्या धर्माचे मूळ आहे. … आणि तेच कसे हीन आहेत ?, हे मी दाखवतो आहे. माझी खात्री आहे की, तीन सहस्त्र वर्षांपासून जे जे या वेदापासून मोहरले आहे, त्या सर्वांचे मूळच मी उखडून टाकले आहे.

हिंदुस्थानातच राहिलेला हिंदु अंतःकरणाने मात्र गोरा साहेब झालेला असणे

आज भारतियांच्या घराघरातील तेजस्वी शिक्षणाचे, संस्काराचे निर्मळ निर्झर आटून कोरडे ठणठणीत झाले आहेत. हिंदुस्थानात, हिंदु घराण्यात, हिंदु म्हणून जन्मला, हिंदु म्हणून वाढला, हिंदुस्थानातच राहिला असला, तरी आज अंतःकरणाने तो हिंदु, गोरा साहेब झाला आहे.

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून संघटित झालेल्या हिंदुत्वनिष्ठांमध्ये भाव आणि कुटुंबभावना वाढीस लागणे

‘हिंदु राष्ट्र-स्थापनेचे ध्येय ठेवून गेली ५ वर्षे ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित केले जात आहे. प्रतिवर्षी भारतातील अनेक राज्यांसह श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, या देशांमधील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होत आहेत. याचा झालेला लाभ म्हणजे या अधिवेशनांमुळे सर्व हिंदुत्वनिष्ठांमधील संघटितपणा टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन आता एकमेकांविषयी कुटुंबभावना निर्माण झाली आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अहोरात्र … Read more

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे अभेद्य संघटन उभे करत असणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘परकीय आक्रमकांनी हिंदुस्थानवर आक्रमणे केली, तेव्हा काही अपवाद वगळता अन्य वेळी तत्कालीन हिंदु राजे, संस्थानिक, सरदार आदींमध्ये एकीचा अभाव दिसला. यामुळेच आक्रमकांना दीर्घकाळ हिंदुस्थानवर राज्य करता आले. या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी हिंदूंचे अभेद्य संघटन निर्माण व्हायला हवे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सद्यस्थितीत हिंदु अधिवेशनांसारख्या माध्यमांतून हिंदूंचे अभेद्य संघटन करत असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले … Read more

इंग्रजी शिक्षण आणि आधुनिक पाश्‍चात्त्य प्रणालींचा प्रभाव यांमुळेच भारतात हुंडाबळीच्या घटनांत वाढ होणे

सती आणि हुंडाबळी यांचा संबंध काय ? सतीची घटना १०० वर्षांत एखादीच घडते आणि हुंडाबळी हे प्रकरण इंग्रजी राज्य आणि इंग्रजी शिक्षण आल्यानंतर चालू झाले. इंग्रजी शिक्षणाने निर्माण केलेल्या आधुनिक पाश्‍चात्त्य प्रणालींच्या चैनी, ऐषारामी जीवनाची ओढ, व्यक्तीस्वातंत्र्य, सनातन हिंदु धर्म परंपरा-रुढी-रिवाज यांकडे तुच्छतेने पहाण्याची वृत्ती, मुलींचे वाढते वय (म्हणजे २८ ते ३२ वर्षे किंवा त्यापेक्षा … Read more

‘ख्रिश्चन धर्मात हिंदु धर्मातून ‘अपराध स्वीकारणे’ आणि ‘प्रायश्चित्त’ घेतले आहेत

‘ख्रिश्‍चन धर्मात आमच्या हिंदु धर्मातून ‘अपराध स्वीकारणे’ (कन्फेशन) आणि ‘प्रायश्‍चित्त’ (रिपेंटन्स) घेतले आहेत. ख्रिश्‍चनांच्या ‘अपराध स्वीकारणे’ यामध्ये केवळ मानसिक स्तरावरची शुद्धीच अभिप्रेत आहे. वैदिक धर्मात मानसिक पापनिष्कृती तर आहेच, तसेच व्रताचरणादी काही शास्त्रीय कर्मे आचरावी लागतात.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (ग्रंथ ‘दिव्यत्वाची शिखरे’, प्रथमावृत्ती : वर्ष २०१०)

स्वार्थांध राजकीय नेते

‘आपण आपल्यातच गुंग आहोत. जनता स्वतःतच गुंग आहे. बहुतांश आमदार-खासदार स्वार्थाने आंधळे झाले आहेत. त्यांना देशाचे काही पडले नाही. त्यांना केवळ खुुुर्ची हवी आहे. अशा नेत्यांना दिसेल, तेथे खडसावा. असे नेते स्वतःही मरतील आणि आपल्या सर्वांना घेऊन मरतील. अधर्माचरणामुळे सध्याच्या हिंदूंची स्थिती सहिष्णुतेच्या अतिरेकामुळे सर्वांत मूढतेची झाली आहे. त्यामुळे ते धर्मांधांच्या अतिक्रमणापुढे नमते घेत आहेत. … Read more

गोवंश हत्या रोखण्याचा प्रभावी उपाय !

‘पूर्वी गोरक्षकांवर अत्याचार होत नव्हते, तर आता गोरक्षकांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे आता हिंदू पेटून उठतील. गोहत्या बंदी कायदा असूनही गोतस्कर आणि गोहत्या करणारे यांना आता मुभा मिळत आहे. जेव्हा हिंदू जागृत होतील, म्हणजे गोवंश हत्या करण्यासाठी देणार नाहीत, तेव्हा गोतस्कर हे गोतस्करी करू शकणार नाहीत.’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

कुंभमेळे का होतात ?

‘आपल्याकडे कुंभमेळे का होतात ? मेळ्याच्या ठिकाणी असलेल्या पवित्र नदीच्या पाण्यात महिनाभर साधुसंतांचे चैतन्य उतरावे आणि सर्वांना त्या चैतन्याला लाभ व्हावा, हा कुंभमेळ्याचा हेतू आहे.’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.४.२०१५)