भारताला ‘मागासलेला’ म्हणणे, यापेक्षा अधिक मूर्खपणा जगात कुठे सापडेल का ?

‘भारत सोडून इतर देशांतील पूर्वजांनी एकाही शोध लावलेला नाही. आपल्या पूर्वज ऋषीमुनींनी जन्मापूर्वीचे आणि नंतरचे जीवन, अनेक युगे, सप्तलोक आणि सप्तपाताळ इत्यादी सर्वच विषयांवरील सर्व माहिती लिहून ठेवली आहे. एवढेच नव्हे, तर जन्म-मृत्यूंच्या फेर्‍यांतून मुक्त कसे व्हायचे, ईश्‍वरप्राप्ती कशी करायची, या सर्वांबद्दलचे ज्ञानही लिहून ठेवले आहे. आपल्याला फक्त अभ्यास करून ते समजून घ्यायचे आहे. भारताची … Read more

क्षात्रतेजापेक्षा साधनेचे ब्राह्मतेज महत्त्वाचे !

‘एखाद्या सात्त्विक राजाचे चरित्र वाचून थोडा वेळ उत्साह वाटतो; पण ऋषिमुनींचे चरित्र आणि शिकवण वाचून अधिक काळ उत्साह वाटतो अन् साधनेला दिशा मिळते !’

संकटसमयी आपल्याला साधनेच्या साठ्याचेच साहाय्य होते.

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

परिपूर्ण अध्यात्मशास्त्र आणि बाल्यावस्थेतील विज्ञान !

‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषि-मुनींनी सांगितलेल्या मूलभूत सिद्धांतात कुणी काही पालट करू शकत नाही; कारण त्यांनी चिरंतन सत्य सांगितले आहे. त्यामुळे त्यात ‘संशोधन’ असे काही नसते. याउलट बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या विज्ञानात ‘संशोधन’ सतत करावे लागते; कारण त्यांचे सिद्धांत काही वर्षांनी पालटत असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विजयादशमीनिमित्त संदेश

विजयादशमीपासून हिंदु समाज आणि देशहित यांच्या रक्षणासाठी सीमोल्लंघन करा ! ‘वर्ष २०२१ ते २०२३ हा जागतिक महायुद्धाचा काळ असणार आहे. या काळात भारतीय सैन्यालाही सीमोल्लंघन करावे लागणार आहे. भारतीय सीमेवर युद्ध चालू झाल्यानंतर शत्रूराष्ट्रांचे हस्तक असणारे देशांतर्गत शत्रू अराजकता निर्माण करण्यासाठी गृहयुद्ध भडकवू शकतात. तसेच देशाच्या दृष्टीने प्रतिकूल असलेल्या या काळात पूर, भूकंप, युद्ध इत्यादींमुळे … Read more

धर्मप्रेमींनो, आपत्काळाच्या दृष्टीने कौशल्यविकास करा !

‘हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन करण्याच्या दृष्टीने आतापर्यंत आपण कौशल्यविकास करत होतो. आता काळानुसार आपत्कालीन परिस्थितीचा प्रतिकार करण्याच्या दृष्टीने विशेषतः हिंदूंच्या रक्षणाच्या दृष्टीने कौशल्यविकास करावा लागेल. सध्याचा काळ हा आपत्काळ म्हणजे संकटकाळ आहे आणि सहा मासांनी येणारा काळ हा प्रत्यक्ष युद्धकाळ आहे. अशा संकटकाळात देशभक्त आणि सत्त्वगुणी हिंदूंचे संरक्षण, तसेच भारताचे संरक्षण हेच धर्मरक्षणाचे कार्य ठरणार … Read more

राजकीय पक्षाचे खरे रूप 

‘सर्व राजकीय पक्ष जनतेला स्वार्थी मागण्या करायला शिकवतात, राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी त्याग करायला शिकवत नाहीत.’

ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग इत्यादींच्या संदर्भात लिखाण करणा-या ऋषींची नावे सहस्रो वर्षे लोकांच्या लक्षात राहणे 

कुटुंबातील आई-वडील, आजोबा, आजी यांची नावे २ – ३ पिढ्यांपर्यंतच कुटुंबाच्या लक्षात रहातात. समाजात वावरणार्‍या संतांची नावे २ -३ पिढ्यांपर्यंत समाजाच्या लक्षात रहातात. अभंग इत्यादी लिखाण करणार्‍या संतांची नावे काही शतके समाजाच्या लक्षात रहातात. ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग इत्यादींच्या संदर्भात लिखाण करणार्‍या ऋषींची नावे सहस्रो वर्षे लोकांच्या लक्षात असतात. याउलट आयुष्यभर अहंभावाने वागणार्‍या राजकारण्यांना लोक काही … Read more

चिरंतन आनंदाची अनुभूती

‘जे बुद्धीप्रामाण्यवादी ‘देव नाही’ म्हणतात, त्यांना भक्तांना येते, तशी चिरंतन आनंदाची अनुभूती कधी येईल का ?’