ऋषीमुनींचे महत्त्व !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या किती राष्ट्रपतींची आणि पंतप्रधानांची नावे किती जणांना ज्ञात आहेत ? याउलट ऋषीमुनींची नावे सहस्रो वर्षे ज्ञात आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारताचे अद्वितीयत्व !

‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

व्यवहार आणि साधना यांमधील भेद

‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांना ‘आमचा मुलगा दैवी बालक आहे’, यामुळे कृतज्ञता वाटते !

‘हल्लीच्या पालकांना ‘आमचा मुलगा इंग्लीश बोलतो’, याचा अभिमान असतो, तर साधकांना ‘आमचा मुलगा दैवी बालक आहे’, यामुळे कृतज्ञता वाटते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा !

‘नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव नोकरीबद्दल थोडेसे काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देईल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

देव शिष्याला दर्शन देतो पण बुद्धीप्रामाण्यवाद्यांना देत नाही यामागील कारणमीमांसा !

‘गुरूंचे ऐकायची शिष्याला सवय लागली की, मगच शिष्य देवाचे सांगणे ऐकतो. असे असल्यामुळे अशा शिष्यालाच देव दर्शन देतो; म्हणूनच तो बुद्धीप्रामाण्यवाद्यांना दर्शन देत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

इतर विषयांवरील लिखाणापेक्षा आध्यात्मिक विषयांवरील लिखाण महत्त्वाचे !

‘एखाद्या संस्थेचा अध्यक्ष, पदाधिकारी असणे किंवा वृत्तपत्राचा संपादक असणे, हे खूप मानाचे समजले जाते. या दोन्ही पदांचा विचार केला, तर समाजामध्ये आजवर अनेक संस्थांचे नामवंत पदाधिकारी, तसेच नामवंत संपादक होऊन गेले आहेत. अनेक पदाधिकार्‍यांनी त्यांच्या संस्थांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्ये केली आहेत, तसेच अनेक संपादकांनी त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनप्रबोधनाचे कार्य केले आहे. असे असले, तरी … Read more

हिंदु धर्मात अनंत ग्रंथ असण्याचे कारण

‘अध्यात्म हे अनंताचे शास्त्र असल्यामुळे हिंदु धर्मात अनंत ग्रंथ आहेत. हे लक्षात न घेता काही धर्मद्वेष्टे हिंदू आणि इतर धर्मीय म्हणतात, ‘हिंदु धर्मात बायबल, कुराण यांसारखा एकच ग्रंथ नाही.’ ते हे लक्षात घेत नाहीत की, बालवाडीला एकच पुस्तक असते, तर पदव्युत्तर शिक्षण घेतांना अनेक पुस्तकांचा अभ्यास करावा लागतो. यासाठी हिंदु धर्मात अनंत ग्रंथ आहेत.’ – … Read more

मृत्यूतून वाचल्यावरच जीवनाचे मोल कळते !

‘आपण जिवंत असेपर्यंत आपल्याला जीवनाचे मोल कळत नाही. एखादा अपघात, मोठे आजारपण यांसारख्या घटनांमध्ये आपण मरता मरता वाचलो की, आपल्याला आपण जिवंत असल्याचे महत्त्व कळते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)

हिंदूंनो, आपल्या एकीचे बळ जाणा

‘भारत स्वतंत्र झाल्यानंतर ७४ वर्षांत काँग्रेसने निवळ हिंदुद्वेष आणि अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण केले. भारताला आणि हिंदु धर्माला नष्ट करण्यासाठी साम, दाम, दंड अन् भेद अशा सर्व नीतींचा वापर केला. काळानुरूप हिंदूंनी एकजुटीने काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आणले. यावरून हिंदूंनो, आपल्या एकीचे बळ जाणा ! केवळ सत्तापालटापुरते नाही, तर ‘अहोरात्र संघटित रहाणे, ही काळाची आवश्यकता आहे’, याचाही बोध … Read more