धर्माचे महत्त्व !

‘धर्म पाप-पुण्य, धर्माचरण इत्यादी संदर्भांत शिकवतो. त्यामुळे मुळातच व्यक्ती सात्त्विक बनते. तिच्या मनात चुकीची गोष्ट करण्याचा विचारही येत नाही. ती पापभीरू बनते, म्हणजे पाप करण्याचे, चुकीची गोष्ट करण्याचे टाळते. त्यामुळे कायद्यांची आवश्यकताच नसते. सत्ययुगात असे होते. तेव्हा राजाही नव्हता आणि कायदेही नव्हते; कारण सर्व जण सात्त्विक असल्याने राजाची अन् कायद्यांची आवश्यकताच नव्हती. आपणही सर्वांना धर्म … Read more

हिंदु राष्ट्राची स्थापना ही ईश्वरनियोजित प्रक्रिया !

‘हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शारीरिक आणि मानसिक स्तरावर क्षात्रतेजाच्या संवर्धनाचे कार्य करत आहेत, तर संत आणि सनातन संस्थेसारख्या अन्य संघटना ब्राह्मतेजाच्या संवर्धनाचे कार्य करत आहेत. हिंदु राष्ट्राची स्थापना ही ईश्वरनियोजित प्रक्रिया आहे. ती काळानुसार पूर्ण होणारच आहे. आपण मात्र आपली साधना आणि हिंदु धर्माविषयीचे कर्तव्य म्हणून या प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे. ‘असे केल्याने आपली … Read more

सकाम साधना आणि आनंदप्राप्तीसाठी साधना

‘एखाद्या इच्छेसाठी (सकाम उद्देशाने) कुणी साधना करत असल्यास साधनेमुळे त्याच्या मनातील ती इच्छा गेल्यावर ‘त्याची वासनापूर्तीसाठी साधना होत नाही’, तर आनंदप्राप्तीसाठी साधना होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ईश्वरप्राप्ती लवकर कशी होईल ?

‘ईश्‍वरप्राप्‍तीसाठी तन-मन-धनाचा त्‍याग करायचा असतो. त्‍यामुळे आयुष्‍य धन मिळवण्‍यात फुकट घालवण्‍यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्‍याग केला, तर ईश्‍वरप्राप्‍ती लवकर होते.’ – (परात्‍पर गुरु) डॉ. आठवले

संताना राग येण्यामागील कारण !

‘सर्वसाधारण व्यक्ती रागावते, ते तिला राग आला म्हणून. संत रागावतात ते साधक, शिष्य सुधारावा म्हणून !’ – (परात्पर गरु) आठवले

मनाचे महत्त्व !

‘पंचज्ञानेंद्रिये नाक (गंध), जीभ (चव), डोळे (दृश्य), त्वचा (स्पर्श) आणि कान (ऐकणे) हे अनुभव घेतात; पण त्यातून मिळणारे सुख-दुःख मनालाच मिळते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सात्त्विक व्यक्तींचे ध्येय !

‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती, तर समष्टी जीवनाचे ध्येय असते रामराज्य !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आधीच्या युगांत स्वभावदोष अल्प असल्याने एखाद्या साधनामार्गाने साधना करून साधक पुढे जात.

‘आधीच्या युगांत स्वभावदोष अल्प असल्याने एखाद्या साधनामार्गाने साधना करून साधक पुढे जात. कलियुगात स्वभावदोष अनेक असल्याने आधी ते दूर करावे लागतात. मगच साधना करता येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.६.२०२१)

एकमेवाद्वितीय हिंदु धर्म !

‘ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी आमीष दाखवावे लागते, मुसलमानांना धमकवावे लागते, तर हिंदु धर्मातील ज्ञानामुळे इतर पंथीय हिंदु धर्माकडे आकर्षित होतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भक्तीचे महत्त्व !

‘पृथ्वीवरची कामेसुद्धा कुणाची ओळख असल्याखेरीज होत नाहीत, तर प्रारब्ध, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी अडचणी देवाची ओळख असल्याशिवाय देव सोडवील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले