भारताची शोकांतिका !
‘भ्रष्टाचार उघडकीस आणणारे प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी दाखवा आणि १ लाख रुपये घ्या’, असे उद्घोषित केले, तरी कुणाला ते पारितोषिक कधी मिळेल का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भ्रष्टाचार उघडकीस आणणारे प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी दाखवा आणि १ लाख रुपये घ्या’, असे उद्घोषित केले, तरी कुणाला ते पारितोषिक कधी मिळेल का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांत आणि विज्ञाननिष्ठांत ‘मला कळते, तेच सत्य’, असा अहंकार असतो आणि नवीन जाणून घेण्याची जिज्ञासा नसते. त्यामुळे त्यांना असलेले ज्ञान अतिशय मर्यादित असते. त्यांना अनंताचे ज्ञान कधीच मिळत नाही. याउलट ऋषींना अहंकार नसल्याने आणि जिज्ञासा असल्याने त्यांची ज्ञानकक्षा वाढत वाढत जाते आणि ते अनंत कोटी ब्रह्मांडांचेही अनंत ज्ञान सांगू शकतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. … Read more
‘धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावी जनता नीतीशून्य झालेल्या भारतात भ्रष्टाचार, बलात्कार, दंगली यांपेक्षा निराळे काय होणार ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘कलियुगांतर्गत कलियुग म्हातारे झाले आहे. आता ते नष्ट होऊन कलियुगांतर्गत सत्ययुग येणार आहे, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘गायींची हत्या झाली, तर गंगा प्रदूषण रोखण्यासाठी कार्यरत असलेल्यांना त्याचे काही वाटत नाही आणि गंगा प्रदूषण रोखण्यासाठी कार्यरत असलेल्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला, तर गोरक्षकांना त्याचे काही वाटत नाही ! प्रत्येकाला ‘हिंदूंचे सर्व प्रश्न माझेच आहेत’, असे वाटेल, तेव्हाच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने हिंदूंची वाटचाल होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या धार्मिक उत्सवाला गर्दी जमवण्यासाठी नाटक, चित्रपट, वाद्यवृंद असे कार्यक्रम ठेवावे लागत नाहीत. याउलट हिंदूंच्या धार्मिक उत्सवाच्या वेळी मात्र असे कार्यक्रम ठेवावे लागतात. यावरून ‘हिंदू केवळ करमणुकीसाठी धार्मिक उत्सव साजरे करतात का ?’, असा प्रश्न पडतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘हिंदू धर्मांतर करतात, ते ईश्वरप्राप्तीसाठी नाही, तर आर्थिक सुख-सोयींसाठी.असे लोक हिंदु धर्मात नाहीत, हेच बरे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘जगातील वैद्य, अभियंता, अधिवक्ता, वास्तूविशारद इत्यादी विविध विषयांतील तज्ञ, तसेच गणित, भूगोल, इतिहास, विज्ञान इत्यादी एकही विषय दुसर्या विषयासंदर्भात एक वाक्य सांगू शकत नाहीत. फक्त अध्यात्म हा एकच विषय विश्वातील सर्व विषयांशी संबंधित त्रिगुण, पंचमहाभूते, तसेच शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती इत्यादींच्या संदर्भात परिपूर्ण माहिती देऊ शकतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भारत सोडून जगातील इतर सर्वच राष्ट्रांनी दुसर्या राष्ट्रांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आपली शक्ती वापरली आहे आणि अजूनही वापरत आहेत. याउलट त्रेता आणि द्वापर या युगांत भारत जगात सर्वसामर्थ्यवान असतांनाही भारताने एकाही देशावर आक्रमण केले नाही. याचे कारण हे की, भारतातील हिंदु धर्मामुळे त्या युगांतही सर्वांचे लक्ष ईश्वरप्राप्तीकडे आणि ऋषीमुनींचे लक्ष ‘१४ विद्या आणि ६४ कला यांच्या … Read more
‘अध्यात्मातील ‘प्रारब्ध’ या शब्दाकडे आणि ईश्वराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे साम्यवाद १०० वर्षांतच समाप्त व्हायला आला आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले