विज्ञानाच्या निकषावर सर्व पडताळून पहाण्यास सांगणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, या प्रश्‍नाचे उत्तर द्या !

बुद्धीप्रामाण्यवादी प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या निकषावर पडताळून पहाण्यास सांगतात. त्यांना स्वप्न पडताळून पहाण्यास सांगितले, तर ते काय सिद्ध करून दाखवतील ? साध्या स्वप्नाचे विज्ञानाच्या दृष्टीने विश्‍लेषण करता न येणारे बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्मातील अनुभूतींचे काय विश्‍लेषण करणार ? – डॉ. आठवले (२१.१.२०१४)

भगवत्कथा ऐकण्यास जाण्याचे लाभ

१. कर्मयोग : कथेसाठी जाणे आणि येणे २. भक्तीयोग : श्रद्धा वाढणे ३. ज्ञानयोग : कथेचा सारांश समजणे प्रवचनाचे वैशिष्ट्य : प्रवचनकार श्रम करतो आणि फळ श्रोत्यांना मिळते ! पुढच्या जन्मी देवाण-घेवाण फिटण्याचे उदाहरण एक मुलगा मूठ मूठ माती घेऊन एका सापावर टाकत होता. सापाने फणा खाली घातला. तितक्यात दुसऱ्या एका माणसाने सापाला मोठा दगड … Read more

धर्माबरोबर शक्ती नसल्याने जगाचा नाश अटळ !

विज्ञानशास्त्र शक्तीशी संबंधित शास्त्र आहे, तर अध्यात्मशास्त्र हे शिवाशी संबंधित शास्त्र आहे. शक्ती शिवाच्या म्हणजे धर्माच्या (सत्याच्या) समवेत असेल, तरच कल्याणकारक होईल. शक्ती शिवाच्या समवेत गेली नाही, तर नाशक (विनाशकारी) होईल. सर्वत्र भगवान आहे, मग मल-मूत्र विसर्जन कसे करणार ? मनुष्याच्या शरिरात सहस्रो जीवाणू मल-मूत्र विसर्जन करतात, तरी तो अपवित्र होत नाही. परमेश्वराच्या शरिरातच सर्व … Read more

भक्ताचा सकारात्मक दृष्टीकोन

एका देवभक्ताच्या आठ मुलांपैकी सात मुले साथीच्या रोगात मेली. त्यांच्या नाास्तिक शेजाऱ्यांनी विचारले, ‘कारे बाबा, कुठे आहे तुझा देव ? आणि कुठे ऐकली देवाने तुझी प्रार्थना ?’ देवभक्त म्हणाला, ‘माझ्या नशिबात माझी आठही मुले मृत होणार होती; पण प्रभुकृपेमुळेच एक मुलगा वाचला’. समाज १. सुदृढ समाज : ज्या समाजात स्थैर्याची भावना आहे, कला-वाङ्मयाची जोपासना केली … Read more

बळी राजाची भक्ती

शुक्राचार्यांनी बळीला सांगितले, ‘हा वामन नाही, श्रीविष्णु आहे’. तेव्हा बळी राजा म्हणाला, ‘धन्य गुरुमहाराज’. गुरु त्यालाच म्हणतात, जो भगवंताचे दर्शन करवतो. देहाला मलीनता येण्याची कारणे १. नेत्र : परनारीला पहाणे. (उपाय : तिला पर नारी म्हणून नाही, तर देवी, आई किंवा बहीण म्हणून पहा.) २. कान : परनिंदा ऐकणे ३. जीभ : दुसऱ्यांचे दोष सांगणे … Read more

गोष्टीरूप अध्यात्म

सर्वजण कोणत्या ना कोणत्या चक्रात पडतात; पण जे चक्रधारीच्या (श्रीकृष्णाच्या) चक्रात पडतात, ते संसारचक्रातून वाचतात. हिंसेपोटी भीती : सिंह हत्तीला मारतो, तरीही तो वनात जातांना मला कोण मारणार तर नाही ना, या भीतीने मागे-पुढे पहात जातो. सिंहाला कोण मारणार ? पण सिंह हिंसा करत असल्याने त्याला भीती वाटते. ज्ञानाचा दिवा आणि संयमाचा आरोध (ब्रेक) नसेल, … Read more

खरी समाजसेवा, म्हणजे समाजाला साधना शिकवणे !

काही जण समाजसेवा करतात. आत्मकेंद्रित, स्वार्थी व्यक्तींपेक्षा समाजसेवा करणारे निश्‍चितच उच्च स्तराचे होत; कारण ते स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत नाहीत. असे असले, तरी साधकांनी समाजसेवेत अडकू नये; कारण समाजसेवा करणे हेही सात्त्विक मायेत येते. साधकांना याच्याही, म्हणजे त्रिगुणांच्या पलीकडे जायचे असल्याने त्यांनी समाजासाठी काही करावे, असे वाटत असले, तर समाजाला साधना शिकवावी. त्याच्याकडून साधना करवून … Read more

संतांचे महत्व!

रोग बरा करणार्‍या आधुनिक वैद्यांपेक्षा भवरोगातून, जन्म-मृत्यूतून मुक्त करणारे संत महत्त्वाचे ! – डॉ. आठवले (११.५.२०१४)

आवश्यक त्या मार्गानुसार उन्नतांंनी साधना सांगणे

एका साधूकडे एक जिज्ञासू तरुण गेला आणि त्याने त्याला विचारले ‘महाराज, मुक्ती मिळवण्यासाठी वनात जायला हवे का ?’ साधू म्हणाला, ‘असे कोण म्हणतो ? तसे असते, तर जनकराजाला राजवैभवात राहूनही जी मुक्ती मिळाली, ती मिळाली असती का ?’ साधूचे हे उत्तर ऐकून तो जिज्ञासू तरुण निघून गेला. थोड्याच वेळात दुसरा एक जिज्ञासू त्या साधूकडे आला. … Read more

देव हवा असेल, तर साधनाच करावी लागते !

आपल्याला व्यवहारातील काही हवे असेल, तर आपण प्रार्थना करतो. आपल्याला देव हवा असेल, तर प्रार्थना करून भागत नाही, तर साधनाच करावी लागते ! – डॉ. आठवले (७.५.२०१४)