प.पू. डॉक्टरांना कार्यासाठी गुरुपरंपरेचे साहाय्य होणे !

५.१.२०१५ पासून प्रतिदिन पूजा केल्यावर प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांना नमस्कार करतांना माझ्याकडून त्यांचे गुरु श्री अनंतानंद साईश आणि श्री अनंतानंद साईश यांचे गुरु श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद यांनाही नमस्कार होऊ लागला. प.पू. रामानंद महाराज यांनी देहत्यागापूर्वी ७ वर्षे माझा मृत्यूयोग टाळणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी अनेक अनुष्ठाने केली होती. श्री … Read more

श्रीकृष्ण पाठीराखा आहे, या श्रद्धेमुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना कोणाचेही भय वाटत नाही !

विरोध करणार्‍या बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना, पोलीस, सरकार आणि धर्मांध यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे साधक आणि कार्यकर्ते यांना भीती वाटत नाही; कारण श्रीकृष्ण पाठीराखा आहे, अशी त्यांंची श्रद्धा आहे; कारण भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, न मे भक्तः प्रणश्यति । (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्‍लोक ३१), म्हणजे माझ्या भक्ताचा नाश होत नाही. २००८ या … Read more

सरकार कोणत्याही पक्षाचे असले, तरी देवस्थान समिती भक्तांचीच हवी !

शासन करणारा पक्ष पालटला की, शासकीय समित्यांवरील पराभूत पक्षांच्या पदाधिकार्‍यांच्या जागी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची नियुक्ती केली जाते. या शासकीय समित्यांमध्ये काही सरकारीकरण झालेल्या देवस्थानांच्या विश्‍वस्त समित्यांचाही समावेश असतो. सत्ताधारी पक्ष पालटतो तसे देवस्थान समित्यांचे पदाधिकारी पालटत असल्यामुळे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी सरकारीकरण झालेल्या मंदिरांचेही राजकारण आरंभले आहे, हे स्पष्ट होते. कोणत्याही देवस्थानाचा कारभार हा राजकारण विरहित असावा, … Read more

पक्षीय धाकामुळे जनतेच्या प्रश्‍नांवर रस्त्यावर उतरण्यास कचरणारे सत्ताधारी पक्षाचे आमदार !

विरोधी पक्षातील आमदार जनतेच्या प्रश्‍नांवर हिरीरीने रस्त्यावर उतरलेले पहायला मिळतात; मात्र हेच आमदार सत्तेत आल्यानंतर जनतेच्या प्रश्‍नांसाठी आंदोलने करतांना आढळत नाहीत. एखादी समस्या गंभीर असेल, तर तुमच्या आंदोलनाला मी मागून सर्व सहकार्य करीन; पण मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यामुळे आंदोलनात कुठे दिसणार नाही, असे सांगतात. वास्तविक ते सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळे ते रस्त्यावर उतरल्यास मनाच्या … Read more

अत्यंत दयनीय झालेली हिंदूंची स्थिती !

धर्मशिक्षणाच्या अभावी आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी निर्माण केलेल्या विकल्पांमुळे हिंदूंना हिंदु धर्माचे अद्वितीयत्व ज्ञात नसल्यामुळे त्यांना धर्माभिमान नाही; म्हणून त्यांची स्थिती जगातील सर्वधर्मियांत अत्यंत दयनीय झाली आहे ! देशाची सर्वच क्षेत्रांत अतिशय वेगाने होणारी अधोगती रोखली नाही, तर देशाबरोबर सर्व हिंदूही रसातळाला जातील ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

साधू-संतांनी हिमालयात खडतर तपश्‍चर्या करण्याची कारणे

अनेक साधू-संतांनी हिमालयात खडतर तपश्‍चर्या केल्याचे वाचनात येते. ते वाचून मला वाटायचे, तपश्‍चर्येसाठी एकांत हवा असेल, तर हिमालयात कशाला जायला पाहिजे ? गावाबाहेर जाऊन ते तपश्‍चर्या का करत नाहीत ? याचे पुढील उत्तर लक्षात आले. १. हिमालय सात्त्विक आहे. त्यामुळे साधनेसाठीचा परिसर शुद्ध करण्यासाठी साधनेचा व्यय होत नाही. २. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मला त्या प्रश्‍नाचे … Read more

एखाद्या धार्मिक कृतीपेक्षा संतांच्या सांगण्यानुसार केलेली तीच कृती अधिक महत्त्वाची !

काही वेळा एखादे संत पूजा, पठण इत्यादी करायला सांगतात. त्यांनी सांगितलेली साधना एखादा आधीपासूनच करत असला, तर त्याला वाटते, मी हे करतच आहे. त्याने लाभ झाला नाही, तर आता तेच करून लाभ कसा होईल ? त्याने हे लक्षात घेतले पाहिजे की, त्या कृतींपेक्षा त्या करण्यास सांगणार्‍या संतांचा संकल्प कृती करतांना कार्यरत होतो. त्यामुळे फलप्राप्ती होते. … Read more

क्रूरतेचा इतिहास नसलेला जगातील एकमेव धर्म म्हणजे हिंदु धर्म !

धर्म एकच आहे आणि तो म्हणजे हिंदु धर्म. इतर सर्व पंथ आहेत. हिंदु धर्म सोडून इतर धर्मांचा (पंथांचा) इतिहास पाहिला, तर त्यात विविध काळांत केलेल्या लाखो हत्यांचा, क्रूरतेचा, बलात्कारांचा, जिंकलेल्या प्रदेशातील स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून विकण्याच्या हजारो नोंदी आहेत. फक्त अनादी काळापासून अस्तित्वात असलेल्या हिंदु धर्माच्या इतिहासात असे एकही उदाहरण नाही. – (प.पू.) डॉ. आठवले

विज्ञानाची अपूर्णता आणि अध्यात्माची पूर्णता

मायेत पुढे पुढे अनेक शोध लागत जातात; कारण माया अनंत आहे आणि विज्ञान अपूर्ण आहे. याउलट अध्यात्मात नवीन शोध लागत नाहीत; कारण ईश्‍वर एक आहे आणि ईश्‍वरप्राप्तीचे सर्व मार्ग परिपूर्ण असल्याने काही शोध लावायचे बाकी नाही. – (प.पू) डॉ. आठवले

मायेपासून दूर जाणे एक वेळ सुलभ आहे; पणमायेतील ब्रह्माची अनुभूती घेणे संतांनाही अती कठीणअसल्याने भगवंताला अवतार घ्यावा लागतो !

साधना करून कुंडलिनीला मूलाधारचक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंत नेणे, म्हणजेच सगुणातून निर्गुणाकडे जाणे एक वेळ सुलभ आहे; पण सगुणातील राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी ब्रह्मरंध्रापासून परत मूलाधारचक्रापर्यंत येणे बहुतेक संतांनाही अती कठीण जाते. ज्या सगुणाला सोडून निर्गुणाकडे जाण्यासाठी त्यांनी साधना केली, त्या सगुणाकडे पुन्हा जाण्यास ते तयार नसतात आणि म्हणूनच भगवंताला अवतार घ्यावा लागतो. हे व्यष्टी साधना … Read more