प्रसिद्धीमाध्यमांनो याकडे लक्ष द्या!

एक मास जरी प्रसिद्धीमाध्यमांनी योग्य पद्धतीने विषयांना प्रसिद्धी दिली, तरी एका मासात देशाची स्थिती पालटेल ! – श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंदसरस्वती महाराज, पूर्वाम्नाय श्रीगोवर्धनमठ, पुरी पिठाधीश्वर (२१.११.२०१३)

स्वतंत्र आणि स्वातंत्र्य

 भारताला ‘स्वातंत्र्य’ मिळाले, म्हणजे नेमके काय झाले ? बाह्यतः परकियांची राजवट गेली आणि स्वकियांची राजवट आली, इतकेच स्वातंत्र्य मिळाले, याचा अर्थ जाणवतो. ‘स्वम् आत्मानं शास्ति सः स्वतन्त्रः ।’, म्हणजे ‘जो स्वत़ःचे, स्वतःच्या आशा-आकांक्षा, भाव-भावना, विकार आणि विचार इत्यादींचे नियमन करतो, तो स्वतंत्र’. येथे आत्मा याचा लौकिक अर्थ अपेक्षित आहे, अध्यात्माचा संबंध नाही. त्याचा भाव आणि … Read more

आध्यात्मिक सत्ता नित्य आणि सनातन आहे !

 भारताचेच उदाहरण पाहिल्यास पूर्वी हिंदुस्थान या संकल्पनेत पाकिस्तान, आताचा भारत, अफगाणिस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका, पूर्व बंगाल, जावा, सुमात्रा, तिबेट, बलुचिस्तान, नेपाळ, भूतान, अक्साई आणि चीन एवढा मोठा भूभाग समाविष्ट होता. त्याचे लचके तोडत प्रचलित भारत राष्ट्र म्हणून उभा आहे. राष्ट्राची मर्यादा काळाच्या ओघात वृद्धी वा क्षय पावू शकते. त्यामुळे राष्ट्र ही संकल्पना पालटणारी आणि परिवर्तनीय आहे; … Read more

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनो, व्यक्तीस्वातंत्र्यामुळे, स्वैराचारामुळे तुमची, तसेच समाज, राष्ट्र आणि धर्म यांची हानी होते, हे लक्षात घ्या !

व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वेच्छेने वागणे, स्वैराचार. प्रत्येकजण स्वेच्छेने, आपल्या मनाप्रमाणे वागला, तर देशाचे काय होते, हे आपण अनुभवत आहोत. १. संयमाने चिरंतन आनंदाची प्राप्ती होते, तर स्वेच्छेने वागण्याने केवळ तात्कालिक सुख मिळते. २. व्यक्तीस्वातंत्र्य असले, तरी मुले अज्ञानी आहेत, असे म्हणून आपण मुलांना स्वेच्छेने अयोग्य वागू देत नाही. त्याचप्रमाणे आपल्या अयोग्य वागण्याचा समाज आणि राष्ट्र यांवर … Read more

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या लढ्यात सनातनच्या साधकांचा मुख्य सहभाग ब्राह्मतेजाच्या रूपात असेल !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज या दोन्हींची नितांत आवश्यकता आहे. सनातनचे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचे कार्य प्रामुख्याने ब्राह्मतेजाच्या स्तरावर असेल. क्षात्रतेज म्हणजे शारीरिक क्षमता, प्रशिक्षण आणि मनाची तयारी. हे सर्व वर्षभरातही साध्य करता येते. आतंकवाद्यांना वर्षभरात तयार करतात, हे त्याचे नेहमीचे उदाहरण आहे. ब्राह्मतेज क्षात्रतेजाप्रमाणे वर्षभरात निर्माण करता येत नाही. ब्राह्मतेजासाठी तन-मन-धनाचा त्याग करून १० … Read more

कलेपेक्षा शिकण्याच्या संदर्भात अध्यात्मविषयक लिखाण महत्त्वाचे !

१. कला : येथे चित्रकलेचे उदारहण घेऊ. एखाद्या देवतेचे सुंदर चित्र काढले, तर चित्र काढणार्‍याला आणि ते पहाणार्‍याला थोडा वेळ आनंद मिळतो. मात्र त्या चित्रातून काहीतरी शिकले, असे होत नाही. २. अध्यात्मविषयक लिखाण : एखाद्या देवतेवरील लिखाणामुळे वाचकाला अभ्यास करण्यास दिशा आणि स्फूर्ती मिळते. यावरून शिकण्याच्या संदर्भात कलेपेक्षा अध्यात्मविषयक लिखाण महत्त्वाचे आहे, हे लक्षात येईल. … Read more

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात किती मुसलमानांनी भाग घेतला?

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लाखो हिंदू कारागृहात गेले आणि हजारो हिंदू फासावर चढले किंवा इंग्रजांच्या गोळीबारात मृत झाले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात किती मुसलमानांनी भाग घेतला ?, असा प्रश्न मुसलमानांना विचारायचे धाडस एकाही हिंदूत नाही. याचा परिणाम हा की, स्वातंत्र्यलढ्यासंदर्भात मुसलमान सांगतात, ‘हसके लिया पाकिस्तान ।’ ते सत्यच आहे. आता मुसलमान ‘लडके लेंगे हिंदुस्तान ।’ ही त्यांची घोषणा सत्यात … Read more

देवाला पृथ्वीवर अवतार घ्यावा लागणार असणे हे मानवासाठी लांच्छनास्पद !

मानवाच्या झालेल्या परमावधीच्या अधोगतीसंदर्भात आपण काहीच न केल्यामुळे देवाला पृथ्वीवर अवतार घ्यावा लागणार आहे. अशी स्थिती होणे, यापेक्षा लांछनास्पद काही असेल का ? – डॉ. आठवले (४.६.२०१४)

बलात्कार करायचा विचारही कोणाच्या मनात येऊ नये, यासाठीचा एकमेव मार्ग, म्हणजे साधना करवून घेणे !

हल्ली भारतात बलात्कारांचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे. त्यावरील उत्तर म्हणून बलात्कार्‍यांना तात्काळ फाशी द्या, अशा तर्‍हेच्या मागण्या समाजातून येत आहेत. या मागण्या बरोबर असल्या, तरी त्या वरवरचे उपाय ठरतात. प्रत्येक बलात्कार्‍याला फाशी दिली, तरी बलात्कार संपणार नाहीत; कारण एखाद्या अतिरेक्याला फाशी दिली, तरी इतर अतिरेक्यांच्या मनात त्यासंदर्भात भीती निर्माण होत नाही, तर ते विचार … Read more

अर्थ आणि काम या पुरुषार्थांवर धर्माचे नियंत्रण असल्याविना समाजोन्नती केवळ अशक्यच !

धर्माचे नियंत्रण नसल्यास मानवाचे गिधाड होणे अर्थ आणि काम पुरुषार्थांवर धर्माचे नियंत्रण अटळ आहे. तेच धर्माचे ध्येय आहे. ते डोळ्यांसमोरून हटले की, माणसाचे गिधाड होते. मग सत्य-असत्य, शुभ-अशुभ, सत्प्रवृत्ती-दुष्प्रवृत्ती, विधी-निषेध यांतील अंतर त्यांच्या लेखी संपून जाते. विधि-निषेधशून्य नागडा स्वार्थ असलेला गिधाडाचा जीवनधर्म समाजाच्या सुधारणा आणि क्रांत्यांच्या मुळाशी असणे अन् त्यामुळे धर्मजीवन पाला-पाचोळ्याप्रमाणे भिरभिरणे प्रत्येक दुर्गुण … Read more