आज्ञापालनाचे महत्त्व !

साधना करतांना मनोलय होणे, हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. नामजप, प्रार्थना अशा भक्तीमार्गातील साधनांनी, तसेच कर्मयोग, ध्यानयोग आणि ज्ञानयोग या मार्गांनीही मनोलय होण्यास बराच काळ लागतो. याउलट आज्ञापालन करत गेल्यास मनोलय आणि बुद्धीलय होण्यास साहाय्य होते. यावरून साधकाने उत्तरदायीत्व असलेल्याचे आणि शिष्याने गुरूंच्या आज्ञेचे पालन करण्याचे महत्त्व लक्षात येते. – (प,पू.) डॉ. आठवले

अधात्म विज्ञाननिष्ठ नको तर विज्ञान अधात्मनिष्ठ हवे !

देवाला न मानणार्‍यांनो, देवाने बनवलेल्या वस्तू न वापरता तुम्ही प्राणी तर दूरचीच गोष्ट आहे; पण मातीचा एक कण तरी बनवून दाखवता का ? – (प.पू.) डॉ. आठवले अधात्म विज्ञाननिष्ठ नको तर विज्ञान अधात्मनिष्ठ हवे. – (प.पू.) डॉ. आठवले, (७.१२.२००७) ‘विज्ञान बुद्धीलय करण्याऐवजी बुद्धीचे कार्य वाढवते; म्हणजे ईश्वरापासून दूर नेते. ईश्वरप्राप्ती करून न देणार्‍या विज्ञानाची किंमत … Read more

कर्मातून (सेवेतून) आनंद अनुभवणे

कर्मातून (सेवेतून) आनंद अनुभवणे प.पू. पांडे महाराज ‘प्रत्येक कृती आपल्या नकळत होत असते, उदा. डोळ्यांनी पहाणे, लिहिणे. त्या आत्मस्वरूप भगवंताकडून चालूच असतात. तोच सर्व अवयवांकडून कृती करवून घेत असतो. त्यामुळे जिवाला अन्य काही करावे लागत नाही. त्यामुळे मन/ वृत्ती आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करावी. हे साध्य होण्यासाठी पुढील कृती कराव्या. १. सातत्याने कृतज्ञता व्यक्त करावी. २. … Read more

तथाकथित पुरोगाम्यांनो, देवावरील विश्‍वास, कुटुंबव्यवस्था आणि संत यांच्यामुळेच समाज टिकून आहे, हे लक्षात घ्या !

भारतात भयानक परिस्थिती असूनही पाश्‍चात्त्यांच्या तुलनेने मानसिक तणाव आणि मानसिक विकृती यांचे प्रमाण फार अल्प का आहे ? भारतात इतर देशांप्रमाणे यादवी होऊन राजसत्ता उलथून का टाकली जात नाही ? ३. हिंदूंच्या देवावरील विश्‍वासामुळे हिंदूंना धनदांडग्यांचा हेवा वाटण्याचे प्रमाण न्यून असणे : हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे ते धर्माचरण करत नसले, तरी मध्यमवर्गियांचा आणि विशेषतः खेडेगावातल्या बहुसंख्य … Read more

कालप्रवाहानुसार हिंदु राष्ट्राच्या अवस्था

मायेतील प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती, स्थिती आणि लय असतो. हिंदु राष्ट्राच्या संदर्भात ते चित्र येथे दिल्याप्रमाणे असेल. वर्षे अवस्था ख्रिस्ताब्द वर्षे प्रधान गुण पहिली ३०० वर्षे उत्पत्ती २०२३ ते २३२२ सत्त्व पुढची ३०० वर्षे स्थिती २३२३ ते २६२२ सत्त्व-रज शेवटची ४०० वर्षे लय २६२३ ते ३०२२ रज-सत्त्व १००० वर्षांनंतर पुन्हा कलियुगांतर्गत कलियुगाचा आरंभ होईल. कालचक्र असेच … Read more

‘इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।’

पंढरपूरला जाऊनसुद्धा पुन्हा आपल्याला परत येण्याची इच्छा होते; म्हणून म्हणतात, ‘इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।’ भावार्थ : ‘इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।’ म्हणजे ‘पंढरपूरला जाणार’, या कल्पनेने वाट पहाण्यात जो आनंद आहे, तो प्रत्यक्ष पंढरपूरला गेल्यावर होत नाही; कारण तेथे गेल्यावर परत घरी यायची इच्छा होते. तसेच परमेश्वराच्या भेटीपेक्षा … Read more

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि इतर संस्थांतील कार्यकर्ते यांच्यातील भेद

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते ईश्‍वरप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी प्रयत्नरत असतात; म्हणून त्यांना इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांप्रमाणे कोणत्याही पदाची अपेक्षा नसते. – डॉ. आठवले

शाळेतच प्रत्येक गोष्ट साधना म्हणून करायला शिकवले असते, तर देशाची दुर्दशा झाली नसती !

कोणालाच त्याचे काम, व्यवसाय साधना म्हणून करायला न शिकवल्याने कामगारांपासून आधुनिक वैद्य (डॉक्टर), वकील इत्यादींपर्यंत सर्वच अधिक पैसे कसे मिळवता येतील ?, याचाच विचार करतात. साधना म्हणून प्रत्येक गोष्ट करायला शाळेतच शिकवले असते, तर देशाची दुर्दशा झाली नसती. – (प.पू.) डॉ. आठवले

भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे, हे सांगण्यासाठी पाश्‍चात्त्यांचे प्रशस्तीपत्र नको !

पारतंत्र्यामुळे आमच्यात न्यूनगंड निर्माण झाल्यामुळेच आता पाश्‍चात्त्यांनी प्रशस्तीपत्र दिल्याविना आम्हाला आमचे सिद्धांत शिरोधार्य वाटत नाहीत. सुदैवाने आता पाश्‍चात्त्य लोकच आमचे पातंजल योगशास्त्रासारखे शास्त्र अभ्यासू लागले आहेत. पाश्‍चात्त्य लोक कितीही भौतिकवादी असले, तरी जिज्ञासू आहेत. त्यांच्या स्तुती-निंदेची अपेक्षा न करता आम्ही आपल्या संस्कृतीचा विचार केला पाहिजे आणि त्याचे आचरण केले पाहिजे. – सुप्रसिद्ध कायदेपंडित श्री. रजनीकांत … Read more

फटाक्यांच्या कारखान्यांवर बंदी न घालणारे राज्यकर्ते जनहिताच्या संदर्भात किती उत्तरदायीशून्य आहेत, हे लक्षात घ्या !

फटाक्यांच्या कारखान्यांवर बंदी न घालणारे राज्यकर्ते जनहिताच्या संदर्भात किती उत्तरदायीशून्य आहेत, हे लक्षात घ्या ! : स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे राज्यकर्ते जनहितकारी नसल्याने फटाके वाजवू नका, यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीला अनेक वर्षे मोहिम राबवावी लागत आहे. एखादे सुबुद्ध सरकार असते, तर त्याने मुळाशी जाऊन फटाक्यांच्या कारखान्यांवर बंदी घातली असती. हिंदु राष्ट्रात हे साध्य होईल. – प.पू. डॉ. … Read more