वैद्यकीय शिक्षण आणि अध्यात्म, म्हणजेच माया आणि अध्यात्म यांतील भेद !

१. वैद्यकीय शिक्षण शरीर सुदृढ रहावे, त्यासाठी मार्गदर्शन करते, तर अध्यात्म देहबुद्धीच नष्ट करते. २. वैद्यकीय शिक्षणातील मानसोपचारशास्त्र मन सुदृढ करायला शिकवते, तर अध्यात्म मनच नष्ट करायला, म्हणजे मनोलयच करायला शिकवते. – डॉ. आठवले

भक्ती नसल्याने देव हिंदूंना साहाय्य करत नसणे

काही जणांना वाटते, हिंदूंवर आणि हिंदु धर्मावर एवढे आघात होत असतांना देव साहाय्य का करत नाही ? याचे उत्तर हे की, भक्त प्रल्हाद,द्रौपदी, मीराबाई यांच्यासारखी भक्ती हल्लीच्या हिंदूंची नाही. भक्ती असली, तरच देव साहाय्य करतो. – डॉ. आठवले

साधनेत तन, मन आणि धन यांचा त्याग करणे

साधनेत तन, मन आणि धन यांचा त्याग करणे अपेक्षित असले, तरी ते क्षमतेप्रमाणे अपेक्षित असते. एखादा आजारी असल्यास त्याने तनाने, म्हणजे शरिराने सेवा करणे अपेक्षित नसते. एखाद्याकडे धन नसल्यास त्याने धनाचा त्याग करणे अपेक्षित नसते. मनाचा त्याग करणेही मनोरुग्णाला शक्य नसते. यामुळे तन, मन आणि धन यांपैकी ज्याचा जेवढा त्याग करणे शक्य असेल, तेवढे करत … Read more

जगद्गुरु कृष्ण

कृष्णं वन्दे जगद्गुरुम् । म्हणजे जगद्गुरु कृष्णाला वंदन करतो. सर्व देवांत फक्त कृष्णालाच जगद्गुरु संबोधले आहे. याचे कारण हे की, त्याने कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग इत्यादी योगमार्ग शिकवलेले आहेत. – डॉ. आठवले (१८.७.२०१४)

जलद उन्नतीसाठी एकांतात राहून केलेल्या व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी साधना उपयुक्त !

हिमालयात एकांतात राहून आयुष्यभर साधना केली, तरी साधकातील स्वभावदोष आणि अहंभाव नष्ट झाले, याची खात्री देता येत नाही. असा साधक जेव्हा समाजात येतो, तेव्हा अनेक वर्षे प्रसंगच न घडल्याने निद्रिस्त असलेले त्याचे दोष बहुदा उफाळून येतात. याचाच अर्थ हा की, एकांतातील व्यष्टी साधनेत दोष लक्षात येत नाहीत. याउलट समष्टी साधनेत इतरांशी वारंवार संबंध येत असल्यामुळे … Read more

अधोगतीला नेणारे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, स्वेच्छेने वागण्याचा हक्क !

शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कसेही वागायला कोणी संमती देत नाही. रस्त्यावरून गाडी कशीही चालवायला व्यक्तीस्वातंत्र्य नसते. आधुनिक वैद्य नसलेल्याला औषधे द्यायला संमती नसते. याचा अर्थ हा की, समाजातील सर्वच क्षेत्रांत व्यक्तीस्वातंत्र्याला संमती नसते. असे असतांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली समाजात स्वेच्छेने कसेही वागायला संमती मागतांना कोणाला काहीच कसे वाटत नाही ? १. स्वेच्छेने वागणे : … Read more

हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ संतांचा संकल्प आणि अस्तित्व यांमुळे होणार असणे !

आपण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यरत हिंदुत्ववादी कार्यकर्ते अन् नेते यांचे कार्य आणि संत करत असलेले कार्य यांत जमीन-आकाशाइतका पुढीलप्रमाणे भेद आहे. येथे लक्षात घेतले पाहिजे की, संतांमध्येही प्रकार आहेत. येथे उल्लेख केलेले संत उच्च स्तराचे आहेत. १. कार्यकर्ते : हे मन आणि स्थूल देह यांच्या स्तरांवर कार्य करतात. २. नेते : हे बुद्धीच्या स्तरावर कार्य … Read more

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनो, व्यक्तीस्वातंत्र्यामुळे, स्वैराचारामुळे तुमची, तसेच समाज, राष्ट्र आणि धर्म यांची हानी होते, हे लक्षात घ्या !

व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वेच्छेने वागणे, स्वैराचार. प्रत्येकजण स्वेच्छेने, आपल्या मनाप्रमाणे वागला, तर देशाचे काय होते, हे आपण अनुभवत आहोत. १. संयमाने चिरंतन आनंदाची प्राप्ती होते, तर स्वेच्छेने वागण्याने केवळ तात्कालिक सुख मिळते. २. व्यक्तीस्वातंत्र्य असले, तरी मुले अज्ञानी आहेत, असे म्हणून आपण मुलांना स्वेच्छेने अयोग्य वागू देत नाही. त्याचप्रमाणे आपल्या अयोग्य वागण्याचा समाज आणि राष्ट्र यांवर … Read more

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या लढ्यात सनातनच्या साधकांचा मुख्य सहभाग ब्राह्मतेजाच्या रूपात असेल !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज या दोन्हींची नितांत आवश्यकता आहे. सनातनचे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचे कार्य प्रामुख्याने ब्राह्मतेजाच्या स्तरावर असेल. क्षात्रतेज म्हणजे शारीरिक क्षमता, प्रशिक्षण आणि मनाची तयारी. हे सर्व वर्षभरातही साध्य करता येते. आतंकवाद्यांना वर्षभरात तयार करतात, हे त्याचे नेहमीचे उदाहरण आहे. ब्राह्मतेज क्षात्रतेजाप्रमाणे वर्षभरात निर्माण करता येत नाही. ब्राह्मतेजासाठी तन-मन-धनाचा त्याग करून १० … Read more

कलेपेक्षा शिकण्याच्या संदर्भात अध्यात्मविषयक लिखाण महत्त्वाचे !

१. कला : येथे चित्रकलेचे उदारहण घेऊ. एखाद्या देवतेचे सुंदर चित्र काढले, तर चित्र काढणार्‍याला आणि ते पहाणार्‍याला थोडा वेळ आनंद मिळतो. मात्र त्या चित्रातून काहीतरी शिकले, असे होत नाही. २. अध्यात्मविषयक लिखाण : एखाद्या देवतेवरील लिखाणामुळे वाचकाला अभ्यास करण्यास दिशा आणि स्फूर्ती मिळते. यावरून शिकण्याच्या संदर्भात कलेपेक्षा अध्यात्मविषयक लिखाण महत्त्वाचे आहे, हे लक्षात येईल. … Read more