राजकारणी आणि आरक्षणवाले स्वार्थ शिकवतात, तर गुरु स्वार्थत्यागच काय, तर…
राजकारणी आणि आरक्षणवाले स्वार्थ शिकवतात, तर गुरु स्वार्थत्यागच काय, तर सर्वस्वाचा त्याग करायला शिकवतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
राजकारणी आणि आरक्षणवाले स्वार्थ शिकवतात, तर गुरु स्वार्थत्यागच काय, तर सर्वस्वाचा त्याग करायला शिकवतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
विज्ञान केवळ स्थूल पंचज्ञानेंद्रियांच्या संदर्भात संशोधन करते, तर अध्यात्म स्थूल आणि सूक्ष्मच नव्हे, तर सूक्ष्मतर, सूक्ष्मतमाचाही विचार करते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांसाठी काही न करणार्या जन्महिंदूंना, म्हणजे ५० प्रतिशत हिंदूंना पुढे येणार्या आपत्काळात, म्हणजे तिसर्या महायुद्धाच्या काळात साहाय्य करून वाचवू नका; कारण हिंदु राष्ट्रात, म्हणजे रामराज्यात रहाण्यासाठी ते लायक नसतील ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली व्यक्तीस्वातंत्र्यवाले थयथयाट करतात. ते विसरतात की, प्राणी आणि मानव यांच्यात महत्त्वाचा भेद म्हणजे प्राणी व्यक्तीस्वातंत्र्यानुसार, म्हणजे स्वेच्छेने वागतात. याउलट मानवाने व्यक्तीस्वातंत्र्य विसरून टप्प्याटप्प्याने कुटुंब, समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचा विचार करून वागणे, म्हणजेच टप्प्याटप्प्याने स्वेच्छेऐवजी परेच्छेने वागणे आणि शेवटी ईश्वरेच्छेने वागणे त्याच्याकडून अपेक्षित असते. असे वागला, तरच तो खर्या अर्थाने मानव असतो, … Read more
शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, हे सर्वसाधारण व्यक्तीच्या संदर्भात खरे असते; कारण त्यांचे कार्य पंचमहाभूतांच्या स्तरावरचे असते. याउलट संतांचे कार्य शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या स्तरावरचे असल्यामुळे त्याचा संबंध शब्द, स्पर्श, रूप… यांच्याशी नसतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
विज्ञानाने सिगारेट, दारू इत्यादींचे दुष्परिणाम सिद्ध केलेले असूनही धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी त्यांसंदर्भात मोहीम उघडत नाहीत. मटका, जुगार यांसंदर्भातही मोहीम न उघडता केवळ हिंदु धर्माविरुद्ध मोहीम उघडून स्वतःला पुरोगामी म्हणवतात, हे लक्षात घ्या ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
समष्टी संत झाल्यावर देवाशी अनुसंधान अधिक व्यापक प्रमाणात साधले जाते. त्यामुळे समष्टी साधनेत देवाला काय अपेक्षित आहे, हे कळते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले संत अधिकतर तात्त्विक भाग सांगतात, तर गुरु प्रायोगिक भाग शिकवतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
वर्गात गडबड करणार्या मुलांना शिक्षक वर्गाबाहेर घालतात. संसदेत आरडाओरडा करून जनतेचे प्रतिदिन २ कोटी रुपये उधळणार्या खासदारांना लोकसभापती तात्काळ सभागृहाबाहेर का घालवत नाहीत ? त्यांना शिक्षकांएवढेही समजत नाही का ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पूर्वीचे राजे राज्याचा त्याग करून वानप्रस्थाश्रम स्विकारायचे आणि अरण्यात जायचे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या एका तरी राज्यकर्त्याने असे केले आहे का ? त्यांच्यामुळेच भारत अधोगतीच्या परमावधीला गेला आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
गाढवाला गुळाची चव काय ? ही म्हण भारतात असलेल्या आध्यात्मिक ज्ञानाच्या संदर्भात सार्थ करणारे स्वातंत्र्यापासूनची ६९ वर्षे भारतावर राज्य केलेले सर्वपक्षीय राज्यकर्ते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले जगभरचे जिज्ञासू अध्यात्म शिकण्यासाठी भारतात येतात; मात्र स्वातंत्र्यापासूनची ६९ वर्षे भारतावर राज्य केलेल्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना न स्वतःला अध्यात्म जाणून घेण्याची इच्छा आणि न जनतेलाही अध्यात्म शिकवण्याची इच्छा … Read more