‘हिंदु राष्ट्रा’साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा !

‘नष्ट करणे सोपे असते; पण घडवणे कठीण असते. असे असले, तरी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करून साधक आणि हिंदु राष्ट्र यांना घडवायचे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भ्रष्ट राजकारण्यांना निवडून देणारी जनताच भारताच्या -हासास कारणीभूत !

‘गेल्या ७४ वर्षांमध्ये भारताची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रांमध्ये अतोनात अधोगती झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय जनतेने वेळोवेळी निवडून दिलेले भ्रष्ट राजकारणी ! एका अर्थाने भ्रष्ट राजकारण्यांना निवडून देणारी भारतीय जनताच भारताच्या र्‍हासास कारणीभूत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ज्यांच्या माध्यमातून चमत्कार घडतात, त्यांच्यावर होणारे आध्यात्मिक परिणाम !

१. कमी आध्यात्मिक पातळीचे : ‘मी हा चमत्कार घडवला’, असे वाटून त्यांचा अहंकार वाढतो. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक पातळी अल्प होत जाते. २. अधिक आध्यात्मिक पातळीचे : ‘ईश्वराने हा चमत्कार घडवला’, याची जाण असल्याने त्यांचा ईश्वराप्रतीचा भाव वाढत जातो. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक पातळी वाढत जाते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.१०.२०२१)

माणूस श्रेष्ठ कि प्राणी आणि वनस्पती ?

‘माणूस सोडून कोणताही प्राणी अथवा वनस्पती सुटी घेत नाही. देवही एक सेकंदाची सुटी घेत नाही. माणूस मात्र शनिवार आणि रविवार सुटी घेतो. एवढेच नव्हे, तर वर्षातूनही काही दिवस हक्काने सुटी घेतो. असे असतांना यासंदर्भात माणूस श्रेष्ठ कि प्राणी आणि वनस्पती ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संत कोणत्या नात्यांशी जोडलेले असतात ?

‘संत हे पत्नी, मुले इत्यादी मायेतील नात्यांशी जोडलेले नसतात, तर ते गुरु, गुरुबंधू, शिष्य यांसारख्या आध्यात्मिक स्तरावरील नात्यांशी जोडलेले असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.११.२०२१)

तिस-या महायुद्धात देव कोणाला वाचवणार ?

‘जे हिंदु राष्ट्रात रहाण्याच्या योग्यतेचे आहेत, त्यांना आगामी तिसर्‍या महायुद्धात देवच वाचवणार आहे. त्यांची काळजी करू नका !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.८.२०२१)

अध्यात्म आणि संस्कृत भाषा यांचा संबंध

‘विज्ञानाची भाषा इंग्रजी आहे, तर अध्यात्माची भाषा संस्कृत आणि संस्कृतोद्भव भाषा आहेत. यामुळे ईश्वरप्राप्ती करू इच्छिणार्‍यांनी संस्कृत किंवा संस्कृतोद्भव भाषेतच अध्यात्म शिकावे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.११.२०२१)

पालकांनो, मुलांच्या जीवनाचे सार्थक होण्यासाठी त्यांना साधना शिकवा !

‘पालक त्यांच्या मुलांमध्ये कला-गुणांचा विकास व्हावा; म्हणून त्यांच्या आवडीनुसार संगीत, नृत्य यांसारख्या कलांचे शिक्षण देतात; परंतु फारच थोडे पालक मुलांच्या जन्माचे सार्थक व्हावे, या उद्देशाने त्यांना साधना शिकण्यास साहाय्य करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.१०.२०२१)

शिक्षणात माणुसकी शिकविण्याचे महत्त्व !

‘शाळेपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत कोणत्याही शिक्षणात माणुसकी न शिकवल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात जनतेला लुबाडणारे व्यावसायिक आणि नोकरी करणारे निर्माण झाले आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले