देव शिष्याला दर्शन देतो पण बुद्धीप्रामाण्यवाद्यांना देत नाही यामागील कारणमीमांसा !

‘गुरूंचे ऐकायची शिष्याला सवय लागली की, मगच शिष्य देवाचे सांगणे ऐकतो. असे असल्यामुळे अशा शिष्यालाच देव दर्शन देतो; म्हणूनच तो बुद्धीप्रामाण्यवाद्यांना दर्शन देत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मृत्यूतून वाचल्यावरच जीवनाचे मोल कळते !

‘आपण जिवंत असेपर्यंत आपल्याला जीवनाचे मोल कळत नाही. एखादा अपघात, मोठे आजारपण यांसारख्या घटनांमध्ये आपण मरता मरता वाचलो की, आपल्याला आपण जिवंत असल्याचे महत्त्व कळते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)

‘आदर्श समाज’ दाखवा !

‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्‍या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंची विनाशाकडे वाटचाल !

‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म अन् मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

आपले आयुष्य आपल्याच हातात !

‘अनेक शारीरिक आजार हे शरिराच्या प्राणशक्तीमध्ये अडथळे आल्यामुळे निर्माण झालेले असतात. प्राणशक्तीमधील हे अडथळे विविध न्यास, मुद्रा आणि त्यांच्या जोडीला योग्य त्या देवतेचा नामजप यांनी दूर करता येतात. ही बिनखर्चिक उपचारपद्धती आत्मसात केल्यास ‘आपले आयुष्य आपल्याच हातात असते’, याची अनुभूती येते. अनेक आजारांसाठी औषधोपचारासह या पद्धतीने उपचार केल्यास अल्पावधीत आजार बरे होतात. सनातनचे अनेक साधक … Read more

मानसिक नव्हे, तर केवळ शारीरिक प्रेम असणारे हल्लीचे पती-पत्नी !

‘हल्लीच्या काळातील स्त्री-पुरुषांमधील प्रेम बहुदा केवळ शारीरिक प्रेम असते. त्यामुळे त्यांना लग्न करायचीही आवश्यकता वाटत नाही आणि त्यांनी लग्न केले, तर ते टिकत नाही. त्यांचे एकमेकांशी पटले नाही, तर ते मानसिक प्रेम नसल्याने जोडीदार बदलत रहातात. लग्न केलेले असल्यास अल्पावधीच घटस्फोट होऊन ते वेगळे होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.२.२०२२)

राजकारणी आणि साधक यांच्या कार्यातील भेद !

‘राजकारणी समाजात स्वतःच्या लाभासाठी ‘मला मत द्या’, असे सांगतात. याउलट साधक लोकांकडे स्वतःसाठी काही मागत नाहीत, उलट ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करा’, असे सांगतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

देवाचे स्थळ असलेल्या ठिकाणी चुकून पाय लागल्यास लाभही होणे !

सात्त्विक जागा, उदा. देवाचे स्थळ अशा ठिकाणी चुकून पाय लागल्यास, त्या चैतन्यदायी जागेला आपला पाय लागला; म्हणून आपल्याला वाईट वाटते. असे असले, तरी त्या चैतन्यदायी जागेच्या स्पर्शाने आपल्या देहात तेथील देवतेचे तत्त्व संक्रमित होते. हा त्याचा लाभही आहे. असे असले, तरी मुद्दामहून पाय लावू नये. त्यामुळे अधिक हानी होते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.१.२०२२)

म्हातारपण हा एकप्रकारे देवाचा आशीर्वादच असतो !

‘मनुष्य जन्माला आल्यापासून वयस्कर होईपर्यंत तो स्वकर्तृत्त्वाचा अभिमान, आप्तस्वकीय, विविध विषयांची आसक्ती अशा अनेक सांसारिक गोष्टींमध्ये मनाने पूर्णतः गुंतून जातो. या स्थितीत त्याला ‘मृत्यू नको’, असे वाटते. त्यानंतर म्हातारपणी विविध आजारपणांमुळे दुःख भोगायला लागते. त्यामुळे त्याला ‘मृत्यू लवकर यावा’, असे वाटते. त्यामुळे म्हातारपण हा एकप्रकारे मायेतून मुक्त करण्यासाठीचा देवाने दिलेला आशीर्वादच आहे, ज्यामुळे मनुष्य स्वतः … Read more