परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन
‘भगवंता, तू किती रे करतोस ! तूच सर्वत्र कार्य करत आहेस’, अशी भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत ठेवली की, अनिष्ट शक्ती रहात नाही. आपला अहं उघड करणे, हा मोठेपणा आहे. त्याने अहं अल्प होतो.’
‘भगवंता, तू किती रे करतोस ! तूच सर्वत्र कार्य करत आहेस’, अशी भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत ठेवली की, अनिष्ट शक्ती रहात नाही. आपला अहं उघड करणे, हा मोठेपणा आहे. त्याने अहं अल्प होतो.’
‘जप म्हणजे काय ? भगवंताचा सतत जप करण्याची आवश्यक काय ? सतत भगवंताशी अनुसंधानित रहाणे, म्हणजे सतत ‘भागवत’ (भगवंताची स्तुती) चालू रहाणे होय. भागवतातील गोष्टी या अनुभूती आहेत. भगवंताची सतत स्तुती करत रहाणे, हेच जीवनाचे लक्षण आहे. सतत त्याच्या ‘स्मरणात’ रहाणे, हे जीवन आहे. येथे सर्वत्र चैतन्य ठासून भरले आहे. तसेच चैतन्याचे स्मरण करणे, ‘चैतन्याविना … Read more
‘साधकांनो, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या भगवंताने दिलेल्या पंचतत्त्वांतून चैतन्य ग्रहण करणे अन् त्या चैतन्याद्वारे कार्य होत असल्याचे पहाणे, एवढेच आपले काम आहे; कारण चैतन्यच कार्य करते; परंतु आपण बाह्य स्वरूपाकडे पहातो, म्हणजे आवरणाशी संबंध ठेवतो.’ भगवंतावर श्रद्धा हवी ! ‘आपण इतकी वर्षे आयुष्य व्यतित केले, तरी उद्याची चिंता रहातेच. भगवंतावर श्रद्धा नाही. … Read more
सतत काहीतरी मागणार्या मुलापेक्षा काहीच न मागणार्या मुलाकडे आईचे जास्त लक्ष असते; कारण तिला ठाऊक असते की, हे मूल काहीच मागणार नाही. तसेच काही न मागणार्या भक्ताकडे ईश्वराला आपणहून आईसारखे धावून यावे लागते. चूक लिहितांना या प्रसंगात मी माझ्या या दोषामुळे भगवंतापासून दूर गेलो, असे लिहावे.
‘प्रार्थना करून भगवंताच्या बुद्धीने, म्हणजे ईश्वरेच्छेने केलेले कर्म, म्हणजे साधना ! सहज झालेली कृती, म्हणजेच कर्म; म्हणून भगवंताला प्रार्थना करावी. ‘तोच सर्व करतो’, असा भाव ठेवावा आणि नंतर कृतज्ञता व्यक्त करावी.’
‘मनुष्य चूक करतो आणि स्पष्टीकरण देतो. ‘स्पष्टीकरण देतो, समर्थन करतो’, म्हणजेच चुकीला जोपासतो आणि चूक वाढवतो. चुकीत वाढ करून तो पापच वाढवतो. त्याने झालेल्या चुकीचे प्रायश्चित्त घेऊन चूक सुधारली पाहिजे.’
आम्ही साधक पुष्कळ भाग्यवान आहोत. आम्हाला मानवजन्म मिळाला आहे. परात्पर गुुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या जन्माचे सार्थक होण्यासाठी निरनिराळे उपाय सांगितले आहेत. त्यांची साधकांवर कृपा आहेच. त्यांच्या केवळ आज्ञापालनाने साधकांचा उद्धार होणारच आहे, हे लक्षात ठेवून साधना करणे, एवढेच साधकांचे कार्य आहे.
समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे ?, असे समर्थ रामदासस्वामींनी म्हटले आहे. समर्थ म्हणजे सम + अर्थ होय. समेला अर्थ आहे. त्यात शक्ती आणि चैतन्य आहे. विठ्ठल दोन विटांवर (द्वैत) उभा आहे, म्हणजे तो समेवर (लाभ होवो किंवा अपलाभ होवो, सर्व सारखे) उभा आहे, याचे दर्शक आहे. त्यामुळे कोटी कोटी ब्रह्मांडांचे ओझे … Read more
‘परकियांच्या आक्रमणांमुळे मराठी भाषेत अन्य भाषांतील शब्दांचा शिरकाव झाल्याने मराठी भाषेची तेजस्विता आणि तिचा प्रभाव उणावला होता. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्य भाषांतील शब्दांच्या ठिकाणी मराठी शब्दांचा उपयोग करायला लावून मराठी भाषेतील शब्दांना महत्त्व दिले. मराठी भाषेत योग्य शब्दाला खूप महत्त्व आहे. त्याला अर्थ आहे आणि त्यामध्ये कार्य करणारी शक्ती आहे; म्हणून त्याला ‘शब्दब्रह्म’ म्हटले … Read more
सध्या आधुनिक कृत्रिम अशुद्ध धाग्यांनी बनलेले असात्त्विक कपडे वापरल्याने रज-तमाचा प्रसार होत आहे. एवढेच नव्हे, तर कपड्यांवरील नक्षीकामही अनिष्ट शक्तींनी भारलेले असते. साहजिकच त्यांतून रज-तमाचा प्रभाव वाढतो. यासाठी सात्त्विक वेशभूषा केली पाहिजे. सध्या आवडी-निवडीचा प्रसार केला जातो. माल विकला जावा, यासाठी दुकानदार त्याचे विज्ञापन करतो आणि आपण त्या प्रलोभनाला बळी पडून स्वतःचे पैसे व्यय करून … Read more