संतांचे चैतन्य !

‘संतांच्या चैतन्यामुळे त्यांच्या संपर्कातील निर्जीव वस्तूतही सकारात्मक पालट होतो, तर त्यांच्या शिष्यांमध्ये होणार नाही का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२८.१२.२०२१)

ध्यानाचे लाभ आणि तोटे

ध्यानामुळे व्यष्टी साधना होते; पण समष्टी साधना होत नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.११.२०२१)

‘साधनेविना ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ करणे अशक्य आहे’, हेही न कळणा-या हिंदुत्वनिष्ठ संघटना !

‘बहुतांश हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्य हे शारीरिक आणि मानसिक स्तरांवरील आहे. त्यांच्या कार्याला साधनेने मिळणार्‍या आध्यात्मिक बळाचा काहीच आधार नाही. अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसंदर्भात बोलतात; पण त्यांच्या लक्षात येत नाही की, हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. साधनेविना ईश्वराचा आशीर्वाद मिळत नाही आणि ईश्वराच्या आशीर्वादाविना काहीच साध्य होऊ शकत नाही. त्यांना ‘हिंदु … Read more

जन्मभर आणि मृत्यूनंतरही काळजी घेणा-या देवाला विसरणारे वयोवृद्ध !

‘म्हातारपणी मुलगा-सून काळजी घेतात; म्हणून त्यांचे कौतुक करणारे वयोवृद्ध जन्मभर आणि मृत्यूनंतरही काळजी घेणार्‍या देवाला मात्र विसरतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.११.२०२१)

अध्यात्मशास्त्र आणि विज्ञान यांमधील भेद !

‘सच्चिदानंद ईश्वराची प्राप्ती कशी करायची, हे अध्यात्मशास्त्र सांगते, तर ‘ईश्वर नाहीच’, असे काही विज्ञानवादी, म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी ओरडून सांगतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भक्ताला अहंभाव नसणे

‘मी साधना करतो’, असा भक्ताला अहंभाव नसतो; कारण ‘त्याच्याकडून सर्व काही, म्हणजे साधनाही देवच करवून घेतो’, हे त्याला ज्ञात असते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.११.२०२१)

हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व !

‘हिंदु धर्मात सांगितले आहे तितके सखोल ज्ञान इतर एकातरी पंथात आहे का ? विज्ञानाला तरी ज्ञात आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पाश्चात्त्य संशोधनाचा फोलपणा !

‘एखाद्या व्यक्तीच्या जीवनात असे का घडते ?, तसेच प्रारब्ध, वाईट शक्ती, सात्त्विकता इत्यादी शब्दही ज्ञात नसलेले पाश्चात्त्य संशोधन वरवरचे आहे, म्हणजे पोरखेळ आहे ! अशा पाश्चात्त्यांचे हिंदू अनुकरण करतात, हे हास्यास्पद आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘आंधळे’ बुद्धीप्रामाण्यवादी !

‘एखाद्या आंधळ्याने दृश्याचे वर्णन करावे, याप्रमाणे धर्माचे शून्य ज्ञान असलेल्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे धर्मासंदर्भातील बोलणे असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धार्मिक ग्रंथांचे नुसते वाचन किंवा पठण न करता त्यात शिकविलेली साधना कृतीत आणा !

‘विविध धार्मिक ग्रंथांचे कित्येक वर्षे काही लाख वेळा पठण केलेल्यांची साधनेत विशेष प्रगती झालेली आढळून येत नाही. याचे कारण हे की, ते नुसतेच पठण करतात. त्यात शिकवलेली साधना कृतीत आणत नाहीत. साधना करण्याची खरोखरीची इच्छा असणाऱ्यांनी ‘स्वत:कडून ही चूक होत नाही ना ?’, इकडे लक्ष द्यावे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१९.३.२०२२)