महान हिंदु तत्त्वचिंतक पू. सीताराम गोयल यांचे तेजस्वी विचारधन !

पू. सीताराम गोयल , एक महान हिंदु तत्त्ववेत्ते, लेखक आणि राजकीय कार्यकर्ते होते. १९४० च्या दशकापर्यंत पू. गोयल हे साम्यवादी विचारसरणीचे होते; परंतु हिंदु धर्माचे महत्त्व अनुभवल्यावर ते हिंदु राष्ट्रवादाचे प्रखर समर्थक ठरले.

स्वैराचार आणि अनैतिकता यांना पूर्णत: निष्प्रभ करण्याचे सामर्थ्य केवळ अध्यात्मात असणे !

‘मानवजातीला बंदुका, तोफा हे नजराणे विज्ञानाने दिलेले आहेत ना ? विज्ञानामुळे झालेल्या लाभांचे योग्य अवधान ठेवून विचारावेसे वाटते, ‘उपरोक्त नजराणे हे मानवजातीचे कोणत्या प्रकारचे कल्याण करीत आहेत ?’

आळंदी

आळंदीत जर विशिष्ट उपकरणे (मीटर्स) घेऊन गेलो, तर ठराविक दिवशी, ठराविक वेळी, ठराविक काळी आणि ठराविक प्रहरामध्ये तेथील चैतन्य आपल्याला त्याने मोजता येते.

जन्मकुंडली, हस्तसामुद्रिक आणि पदसामुद्रिक यांतील भेद

‘हात आणि पाय यांवरील रेषांचा संबंध पूर्वजन्मातील कर्माशी असल्यामुळे त्यांना ‘कर्मरेषा’ असे संबोधले जाते. क्रियमाण कर्म केल्यामुळे कर्मरेषांमध्ये सूक्ष्म-पालट होऊन कालांतराने हे सूक्ष्म-पालट दृश्य स्वरूपात स्थुलातून दिसू लागतात.

अनेक दैवी गुणांमुळे प्रपंचाचा डोलारा सहजतेने सांभाळणारी घराची स्वामिनी !

देवाच्या शासनात चार महत्त्वाची खाती स्त्रीदेवतांकडेच सदासाठी देण्यात आली आहेत आणि त्या आपापली खाती समर्थपणे आणि उत्तम रितीने सांभाळत आहेत. आपल्या शक्तीने दुष्टांचा संहार करण्याचे संरक्षण खाते कालिकादेवीकडे, अर्थ खाते श्री लक्ष्मीदेवीकडे, शिक्षण खाते सरस्वतीकडे, तर अन्न खाते अन्नपूर्णादेवीकडे आहे. या देवतांनी आपल्यातील अंश गृहिणीकडे दिला आहे; म्हणून ती सारे घर आणि प्रपंच समर्थपणे सांभाळू शकते, तसेच स्वसामर्थ्यावर तोलून धरू शकते.

सप्तर्षि जीवनाडी

वैश्‍विक कार्याच्या आवश्यकतेप्रमाणे वर्तमानकाळात कार्य करणारा सप्तर्षींचा गट वेगवेगळा असतो; मात्र सर्वत्र बहुतांशी आदिगुरु म्हणून वसिष्ठच मार्गदर्शन करतात आणि जनसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून महर्षि विश्‍वामित्र वसिष्ठांना प्रश्‍न विचारत असतात.

भृगुसंहिता आणि सप्तर्षि जीवनाडी

सप्तर्षींच्या गटात भृगु येत नाहीत. ते सप्तर्षींच्याही वर आहेत. साक्षात् भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या १० व्या अध्यायात म्हटले आहे, महर्षींमधले महर्षी जे आहेत, त्यात भृगु म्हणजे मीच आहे.

हस्तरेषा, जन्मकुंडली आणि नाडीभविष्य

हस्तरेषा आणि पादरेषा, तसेच जन्मकुंडली या दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे की, जन्मवेळ चुकीची असल्यास भविष्य चुकते; मात्र हाताच्या रेषा प्रत्यक्ष दिसतात. त्यामुळे त्यावरून सांगितलेले भविष्य चुकण्याची शक्यता कमी असते का ?

हिंदु धर्मातील यज्ञातील हवनातून निर्माण होणारा धूर आणि इतर कारणांमुळे निर्माण होणारा धूर

येथे यज्ञामुळे वातावरण आणि मानव यांच्यावर कसा चांगला परिणाम होतो, याचे सविस्तर विवेचन केले आहे. यज्ञाचे लाभ समजावेत, यासाठी यज्ञाचा धूर आणि प्रदूषण करणारे हानीकारक धूर यांची तुलना केली आहे.

स्वाध्याय आणि संस्काराच्या आधाराने नवीन राज्यव्यवस्थेची नितांत आवश्यकता !

एखाद्यावर शस्त्राने आघात केला किंवा एखाद्या व्यक्तीवर विषप्रयोग केला, तर ती एकच व्यक्ती मृत पावते; परंतु एखाद्या राष्ट्र्रातील जाणकार लोक, विद्वान, बुद्धीमंत, विचारवंत, समाजनेते, राजकारणी पुरुष यांच्यामध्ये बुद्धीभ्रंश निर्माण केला किंवा विकृत विचार निर्माण केले, तर ते संपूर्ण राष्ट्र्र नाश पावते.