हिंदूंनी धर्माचरणाचे महत्त्व समजून घ्यावे ! – डॉ. सतीश बागुल, सनातन संस्था

डॉ. बागुल यांनी ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर आपले विचार मांडले. यात त्यांनी धर्माचरणाचे महत्त्व, सणांचे होणारे विकृत स्वरूप, देवतांचे होणारे विडंबन, कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व, वाढदिवस हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे कसा साजरा करावा ? हे विषय मांडले.

मंगळूरू येथे सनातन संस्थेच्या वतीने कर्नाटक राज्यस्तरीय युवा शिबीर

सनातन संस्थेच्या वतीने येथील सेवाकेंद्रात २३ ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीत ‘कर्नाटक राज्यस्तरीय युवा शिबीर’ आयोजित करण्यात आले होते.

सनातन संस्था करत असलेले अध्यात्मप्रसाराचे कार्य प्रशंसनीय ! – राकेशगिरीजी महाराज, मध्यप्रदेश

राकेशगिरीजी महाराज म्हणाले, ‘‘कर्म हे देवासाठी केले आणि तेही भक्ती करत केले तर ते अधिक लाभदायक ठरते.

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांचा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध

स्थानिक दत्त चौक येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धन्वंतरि देवाला प्रार्थना करून औषधी वनस्पतींना केवळ एक मिनिट हस्तस्पर्श केल्यावर त्या वनस्पतींवर झालेला सकारात्मक परिणाम

औषधी वनस्पतींमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे आयुर्वेदात त्यांचा उपयोग विविध विकार बरे करण्यासाठी केला जातो. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या लागवड परिसरात नरक्या, शतावरी, गवती चहा, आवळा, वाळा, बेल, चंदन आदी औषधी वनस्पतींचे रोपण करण्यात आले आहे.

कुंभमेळ्यातील काही प्रथा आणि त्यांचा इतिहास

कुंभमेळ्याच्या वेळी भरलेल्या धार्मिक संमेलनात शस्त्र धारण करण्याविषयी निर्णय होऊन एकत्र येण्याचे ‘अखंड आवाहन’ करण्यात आले. ‘अखंड’ शब्द पुढे आखाडा या नावे रुढ झाला. हिंदु धर्मात चार आश्रमांपैकी संन्यासाश्रमाला प्राधान्य दिले गेले.

राधा-कृष्ण प्रेम यांतील वास्तव जाणा !

उत्तर भारतातील अनेक हिंदीभाषी संत-कवींनी भगवान् श्रीकृष्ण आणि राधा यांच्याविषयी श्रृंगाररसपूर्ण काव्यरचना केल्या. त्यानंतर हिंदी आणि अन्य भाषेतील कवींनीही अशा प्रकारची अनेकानेक गीते रचली.

२५ डिसेंबर २०१८ ते २ जानेवारी २०१९ या कालावधीत फटाके फोडण्यास बंदी घालण्याची मागणी

सनातन संस्थेच्या सौ. रोहिणी जोशी यांनी सांगितले की, केरळमध्ये लक्षावधी महिला आणि पुरुष भक्तांनी शबरीमला मंदिराच्या परंपरेच्या रक्षणार्थ मोठ्या प्रमाणात मोर्चे, आंदोलने आदी सनदशीर माध्यमातून निषेध नोंदवला.