प्रतिदिन दुर्गा सप्तशती पोथीतील देवीकवच म्हणा !

आपत्कालात देहाचे रक्षण होण्यासाठी, तसेच अनेक व्याधींपासून (हाडेदुखी, स्नायूदुखी, अनेक दुर्धर आजार, रक्तव्याधी) मुक्त होण्यासाठी साधकांनी प्रतिदिन दुर्गा सप्तशतीमधील चण्डिकवच (देवीकवच) म्हणणे आवश्यक आहे.

आदित्यहृदय स्तोत्र

आदित्यहृदय स्तोत्र लावून या स्तोत्रातील चैतन्यामुळे स्वत:च्या हृदयाच्या भोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी सूर्यदेवाला प्रार्थना करून हे स्तोत्र सलग ३ वेळा ऐकावे…

शनिस्तोत्र

कोणस्थ, पिंगल, बभ्रु, कृष्ण, रौद्र, अंतक, यम, सौरि, शनैश्चर आणि मंद या दहा नावांनी पिप्पलादऋषींनी शनिदेवाची स्तुती केली. ही दहा नावे सकाळी उठल्यावर जो म्हणील, त्याला कधीही शनिग्रहाची बाधा होणार नाही.

मारुतिस्तोत्र

समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेल्या मारुतिस्तोत्रात ते विविध नावांनी मारुतीच्या रूपाचे वर्णन आणि त्याची स्तुती करतात.

अथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम आणि लाभ

थर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती आणि शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरश्‍चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष होय. भगवान जैमिनीऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गलऋषी यांनी साममुद्गल गणेशसूक्त लिहिले. त्यानंतर त्यांचे शिष्य गणकऋषी यांनी श्री गणपति अथर्वशीर्ष लिहिले.

मयूरेशस्तोत्रम्

हे स्तोत्र साक्षात् ब्रह्मानेच सांगितले असून त्याची पुढीलप्रमाणे फलश्रुती श्रीगणेशाने सांगितली आहे – कारागृहातील निरपराधी कैद्यांची ७ दिवसांत सुटका होते.