‘गोबेल्स’ नीतीचा अवलंब करणार्‍या ‘बीबीसी’ला राष्ट्रभक्तांनी धडा शिकवायला हवा ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘भारत हिंदु राष्ट्र घोषित होऊ नये आणि भारताची प्रगती होऊ नये’, यासाठी देशविरोधी शक्ती कार्यरत आहे. ‘बीबीसी’ हा त्यांचा चेहरा आहे.

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनात सनातन संस्‍थेच्‍या ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

या प्रदर्शनामध्‍ये शास्‍त्रोक्‍त भाषेत लिहिलेले अध्‍यात्‍म, राष्‍ट्र आणि धर्म, आयुर्वेद, धर्माचरण इत्‍यादी विषयांवरील ग्रंथ ठेवण्‍यात आले होते. तसेच मराठी भाषेवरील अद्वितीय ग्रंथही या प्रदर्शनात उपलब्‍ध होते.

‘गोबेल्‍स’ नीतीचा अवलंब करणार्‍या ‘बीबीसी’ला राष्‍ट्रभक्‍तांनी धडा शिकवायला हवा ! – अभय वर्तक, सनातन संस्‍था

‘बीबीसी’च्‍या ‘डॉक्‍युमेंट्री’मध्‍ये मोदीजींवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण केले आहे. हे प्रश्‍नचिन्‍ह केवळ मोदींवर नसून भारताच्‍या जनतेवरही आहे; कारण भारतीय जनतेने मोदीजींना निवडून दिले आहे.

नंदुरबार येथील उद्योजक नितेश अग्रवाल यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सनातनच्या संस्कार वह्यांचे वाटप !

जळगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना उद्योजक नितेश अग्रवाल यांच्या वतीने सनातन संस्थेच्या संस्कार वह्यांचे आणि अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सनातन संस्थेची संस्कार वही विद्यार्थ्यांच्या मनातील राष्ट्रभावना जागृत ठेवण्यासाठी निश्चित प्रेरणा देत राहील, असा विश्वास या प्रसंगी श्री. अग्रवाल यांनी व्यक्त केला.

देशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे !

उत्तरप्रदेशमधील मदरशांचे ‘डिजिटलायजेशन’ केल्यावर तेथे १०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे.

भारतीय अर्थव्यवस्थेला समाप्त करण्यासाठी हलाल व्यवस्था एक षड्यंत्र ! – अमोल कुलकर्णी, सनातन संस्था

हलाल’च्या वाढत्या मागणीमुळे मांसविक्रीचा वार्षिक अनुमाने ३ लाख कोटी रुपयांचा संपूर्ण व्यवसाय धर्मांधांच्या नियंत्रणात जात आहे. हलाल व्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेला समाप्त करण्यासाठी रचलेले एक षड्यंत्र आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. अमोल कुलकर्णी यांनी केले.

सनातन संस्थेच्या वतीने देहली येथे जीवनावश्यक वनस्पतींचे वृक्षारोपण

सध्या वाढत असलेले प्रदूषण पहाता आज प्रत्येक भारतियाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून सनातन संस्थेच्या वतीने अलकनंदा येथील ‘मंदाकिनी एन्क्लेव्ह’ या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

पनवेल येथे धर्मप्रेमींच्या एकजुटीने निघाली यशस्वी हिंदू एकता दिंडी !

छत्रपती शिवरायांची कर्मभूमी, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जन्मभूमी रायगड येथील हिंदू एकता दिंडीत सहभागी धर्मप्रेमी हिंदूंनी हिंदु राष्ट्राचा जयघोष केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त २८ मे या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने हिंदू एकता दिंडी काढण्यात आली.

गणरायाच्या सांगलीत ‘हिंदू एकता दिंडी’च्या निमित्ताने दीड सहस्र हिंदूंचा हिंदू एकतेचा हुंकार !

गणरायाच्या सांगलीत ‘जय श्रीराम’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘हिंदु धर्म की जय’, अशा घोषणांनी मार्गक्रमण करणाऱ्या अत्यंत शिस्तबद्ध आणि हिंदू एकतेचा हुंकार देणाऱ्या हिंदू एकता दिंडीने सांगलीकरांची मने जिंकली.

क्षात्र आणि ब्राह्म तेजाचा हुंकार देणारी सातारा येथील भव्य ‘हिंदू एकता दिंडी’ !

सातारा – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे सनातन धर्माचा प्रसार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या ध्येयाच्या दिशेने कार्यरत असणारे अवतारी पुरुष आहेत. त्यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त सातारा येथे २४ मे या दिवशी भव्य ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. दिंडीचा प्रारंभ शंखनादाने झाला. दिंडी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि सातारा शहराचे … Read more