सोलापूर जिल्ह्यात ३ ठिकाणी, तर लातूर, धाराशिव आणि बारामती येथे भावपूर्ण वातावरणात पार पडला सनातन संस्था आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव !

गुरुपौर्णिमेचा उद्देश केवळ गुरुचरणी नतमस्तक होणे, हा नसून या दिवशी गुरुसेवेची ही अमूल्य पर्वणी मिळते. आत्मज्ञान हे केवळ गुरूंमुळे प्राप्त होते, त्यासाठी नियमित गुरुसेवा करणे आवश्यक आहे. गुरूंना जे आवडते, ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करायला हवा.

सांगली जिल्ह्यात सनातन संस्था द्वारा ३ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

येथे सकाळी झालेल्या उत्सवात पू. राजाराम नरुटे यांची वंदनीय उपस्थिती होती, तर सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात भाजपचे नगरसेवक लक्ष्मण नवलाई उपस्थित होते. येथे १८० जिज्ञासू उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यात सनातन संस्था आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला !

जिल्ह्यात ठाणे येथे २ ठिकाणी, तसेच डोंबिवली आणि अंबरनाथ येथे प्रत्येकी एक असे सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा लाभ ५०० हून अधिक जिज्ञासू आणि साधक यांनी घेतला.

परात्परगुरु डॉ. आठवले यांचा साधना प्रवास : खंड १, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरूं कडून शिकणे’, या सनातन-निर्मित ग्रंथाचे प्रकाशन !

कोल्हापूर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात सनातन-निर्मित ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधना प्रवास : खंड १, या मराठी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन सनातनच्या संत पू. आधुनिक वैद्या (श्रीमती) शरदिनी कोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम सात्त्विक, पवित्र आणि दैवी आहे. येथे असतांना ‘मी सकारात्मक ऊर्जेच्या विश्वात आहे’, असे मला वाटले. मला सनातनच्या (राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या) कार्यात सहभागी व्हायचे आहे.’

निरोगी रहाण्यासाठी दिवसभरात किती वेळा आहार घ्यावा ?

पावसाळ्यात दिवसातून केवळ २ वेळा आहार घेण्याची सवय अंगी बाणवल्यास एकदा घेतलेले अन्न पूर्ण पचल्यावरच दुसरे अन्न जठरात येते. त्यामुळे अन्नपचन नीट होते. शरिराला अधिकचे २ वेळा अन्न पचवण्याचे श्रम न झाल्याने शेष राहिलेली शक्ती पालटलेल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वापरता येते.

मदुराई (तमिळनाडू) येथे सनातन संस्था आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

१० जुलै २०२२ या दिवशी मदुराई (तमिळनाडू) येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. या कार्यक्रमाचा प्रारंभ प्रार्थनेने झाला. यानंतर सौ. लक्ष्मी नायक यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गुरुपौर्णिमेच्या संदेशाचे वाचन केले.

गुरुपौर्णिमा निमित्त बेंगळुरू (कर्नाटक) येथील आचार्य श्री महाप्रज्ञा शाळेत सनातन संस्था द्वारा आयोजित प्रवचन संपन्न

जीवनात संस्कारांना पुष्कळ महत्त्व आहे. भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपु नावाच्या राक्षसाचा पुत्र असूनही धर्माने त्याचा आदर्श घेण्यास सांगितले. त्यामुळे कुठे जन्म झाला ? यापेक्षा कोणते संस्कार झाले आहेत, हे मुख्य मानले गेले आहे. त्यामुळे आपण सर्वजण उत्तम संस्कार वाढवून देशाचे उत्तम नागरिक होऊया

जळगाव, चोपडा, धुळे, ब्रह्मपूर येथे सनातन संस्था आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरे !

जळगाव, चोपडा, धुळे, ब्रह्मपूर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा ! प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती अन् धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे.

वर्धा येथे ३ ठिकाणी सनातन संस्था आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव चैतन्यमय वातावरणात साजरा !

सनातन संस्थेच्या वतीने १३ जुलै या दिवशी येथील संताजी सभागृह आणि यमुना लॉन, तर हिंगणघाट येथील संत कँवरराम भवन या ३ ठिकाणी चैतन्यमय वातावरणात ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ साजरा करण्यात आला.