केवळ २ वेळाच आहार घेण्याची आरोग्यदायी सवय अंगी बाणवण्यासाठी हे करा !

मनाचा निश्चय असेल आणि ४ दिवस कळ सोसण्याची सिद्धता असेल, तर या लेखात दिल्याप्रमाणे आहाराच्या वेळा ४ वरून २ वर आणणे सहज शक्य आहे; परंतु…

अधिक पावसाच्या प्रदेशांत निरोगी रहाण्यासाठी दिवसभरात केवळ २ वेळा आहार घ्या !

पावसाळ्यात दिवसातून केवळ २ वेळा आहार घेण्याची सवय अंगी बाणवल्यास एकदा घेतलेले अन्न पूर्ण पचल्यावरच दुसरे अन्न जठरात येते. त्यामुळे अन्नपचन नीट होते. शरिराला अधिकचे २ वेळा अन्न पचवण्याचे श्रम न झाल्याने शेष राहिलेली शक्ती पालटलेल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वापरता येते.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करावे ?

सध्या प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) या संकल्पनेला भलतेच महत्त्व आले आहे. प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे, याकरता अगदी साध्या, सोप्या आणि स्वस्त गोष्टी करता येऊ शकतात.

‘ऑनलाईन’च्या काळात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्या !

डोळे निरोगी ठेवण्यासाठी दिवसभरात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करणे महत्त्वाचे असते. डोळे निरोगी रहाण्यासाठी आदर्श दिनचर्या कशी असावी ? याविषयी जाणून घ्यायला हवे. आयुर्वेदाने प्रथम याच गोष्टींना महत्त्व दिले आहे.

लाकडी घाण्याचे आरोग्यदायी तेल !

लाकडी घाण्याचे तेल हे अत्यंत शुद्ध, रसायनेविरहित आणि आरोग्यास हितकारक असते, तसेच ते नैसर्गिक अन् शास्त्रोक्त पद्धतीने निर्माण केले जाते. त्याला शुद्ध तेलाचा वास येतो आणि ते चिकटही असते; कारण त्यामध्ये ४-५ प्रकारचे जीवनसत्त्वे असतात. लाकडी घाण्यात तेल काढतांना अत्यल्प घर्षण झाल्याने त्यातील एकही नैसर्गिक घटक नाश पावत नाही.

आयुर्वेदातील महत्त्वपूर्ण चिकित्सा असणारे पंचकर्म !

‘निरोगी मनुष्याच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि रोगी मनुष्याला रोगमुक्त करणे’ हे आयुर्वेदाचे प्रमुख उद्दिष्ट साध्य करावयाचे पंचकर्म हे एक साधन आहे. रोगापासून मुक्तता आणि निरोगी, दीर्घायुष्य देणारे ही एक आयुर्वेदाची स्वतंत्र अन् खास चिकित्सापद्धत आहे.

दुग्धजन्य पदार्थ कुणी आणि कधी खावेत ?

पनीर, क्रीम, साय, खवा, दुधाची भुकटी, आटवलेले घट्ट दूध या सगळ्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक पदार्थाचा वेगळा विचार आणि त्याप्रमाणे निवड करणे आवश्यक ठरते.

शरीर निरोगी राखण्यासाठी आयुर्वेदोक्त नियमांचे पालन करा !

शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् । म्हणजे धर्माचरणासाठी (साधना करण्यासाठी) शरीर निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे.

आरोग्यप्राप्तीसाठी प्रतिदिन उन्हाचे उपाय करा ! (अंगावर ऊन घ्या !)

आजकालच्या पालटलेल्या जीवनशैलीमुळे, विशेषतः घरी किंवा कार्यालयात बैठे काम करणा-या व्यक्तींमध्ये अंगावर ऊन पडण्याची शक्यता पुष्कळ उणावली आहे.

असे सांभाळा शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ !

आपले शरीर आणि मन आरोग्यसंपन्न ठेवणे हा मनुष्याचा धर्म आहे. दिनचर्या आणि ऋतूचर्येचे नियम पाळल्याने शरीर सदृढ आणि आरोग्यसंपन्न रहाते.