सोलापूर जिल्ह्यात ३ ठिकाणी, तर लातूर, धाराशिव आणि बारामती येथे भावपूर्ण वातावरणात पार पडला सनातन संस्था आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव !

गुरुपौर्णिमेचा उद्देश केवळ गुरुचरणी नतमस्तक होणे, हा नसून या दिवशी गुरुसेवेची ही अमूल्य पर्वणी मिळते. आत्मज्ञान हे केवळ गुरूंमुळे प्राप्त होते, त्यासाठी नियमित गुरुसेवा करणे आवश्यक आहे. गुरूंना जे आवडते, ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करायला हवा.