सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांना “धर्म अलंकार पुरस्कार” आणि “माँ पटन देवी सन्मान” ने सन्मानित

येथे ४ ते ६ एप्रिल या कालावधीत आयोजित ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू आणि तंत्र संमेलना’त सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) जयंत बाळाजी आठवले यांना धर्म आणि आध्यात्म या क्षेत्रांतील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी ‘‘धर्म अलंकार पुरस्कार’’ आणि “माँ पटन देवी सन्मान” देऊन सन्मानित करण्यात आले.

खोपोली येथे वाढदिवसानिमित्त उद्योजक यशवंत साबळे यांच्याकडून सनातन संस्थेच्या लघुग्रंथांचे वितरण !

वाढदिवस म्हणजे केवळ जल्लोष आणि पाश्चात्त्य प्रथांचे अंधानुकरण नसून तो समाजहित आणि धर्मप्रसार यांचा भाग असू शकतो, याचा आदर्श खोपोलीतील उद्योजक श्री. यशवंतशेठ लक्ष्मण साबळे यांनी घालून दिला आहे. श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधून आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सनातन संस्था प्रकाशित ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ आणि हनुमानचालिसा’ या लघुग्रंथांच्या ५०० प्रतींचे वितरण केले.

राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !

सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ अंतर्गत राजहंसगड गावात भव्य ‘श्रीराम नामदिंडी’ उत्साही, चैतन्यमय आणि भावपूर्ण वातावरणात नुकतीच पार पडली.

सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

आपण सर्वजण आनंदाच्या शोधात असतो; मात्र सुखाच्या मागे धावल्यामुळे जीवन तणावग्रस्त होते. अध्यात्म हे एक शास्त्र असून त्याप्रमाणे आचरण केल्यामुळेच आपण खर्‍या अर्थाने आनंदी राहू शकतो. सध्याच्या आपत्काळात साधना आणि नामस्मरण यांविना पर्याय नाही. अध्यात्म ही आनंदी जीवन जगण्याची सुंदर कला आहे, जी शाळा-महाविद्यालयांत शिकवली जात नाही.

गौतम खट्टर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन सनातन संस्थेने केले नव्हते !

गेल्या काही दिवसांपासून श्री. गौतम खट्टर यांनी फ्रान्सिस झेविअरच्या संदर्भात केलेल्या विधानावरून गोव्यात जाणीवपूर्वक धार्मिक तणाव निर्माण केला जात आहे. या वादाचा आडोसा घेऊन काही समाजकंटक सनातन संस्थेला विनाकारण लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !

‘सूक्ष्म जगताचे अध्ययन आणि मार्गदर्शन करणे, हे सनातन संस्थेचे वैशिष्ट्य आहे. हे कार्य करता करता परब्रह्माशी एकरूप होण्याची शिकवण आहे. विश्व हिंदु परिषद प्रत्यक्ष जगात कार्य करणारी संघटना आहे, तर सनातन संस्थेचे कार्य परजगातील (सूक्ष्मातील) आहे’, असे गौरवोद्गारही अधिवक्ता आलोक कुमार यांनी सनातन संस्थेविषयी येथे काढले.

वृंदावनचे परम गोभक्त संत गोपेश कृष्णदास महाराज यांची गोव्यातील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

वृंदावनचे परम गोभक्त संत गोपेश कृष्णदासजी महाराज, प्रकाश दासजी महाराज आणि प्रकाश नारायणजी महाराज यांनी येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.

राज्यस्तरीय काव्यसंमेलनात सनातन संस्थेचे मुंबईतील साधक रोहन पातेने यांचा ‘काव्यरत्न पुरस्कारा’ने सन्मान !

दादर येथील सांस्कृतिक सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या ‘राज्यस्तरीय त्रिवेणी काव्यसंमेलना’त सनातन संस्थेचे मुंबई येथील साधक श्री. रोहन रवींद्र पातेने यांचा ‘काव्यरत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

जय शंकर प्रतिष्ठान’चे पप्पाजी पुराणिक यांच्या हस्ते सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांचा सन्मान !

कार्यक्रमात सद्गुरु स्वाती खाड्ये यांनी उपस्थितांना अमूल्य मार्गदर्शन करून शुभाशीर्वाद दिले. काही मुलांना त्यांच्या हस्ते हनुमानचालिसा पठण स्पर्धेची बक्षिसे देण्यात आली.

जैन मंदिरांना सिलिंडर उपलब्ध करून देण्याच्या मागणीवरून वादंग निर्माण करणे चुकीचे ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

मंदिरांचे रक्षण करणे, हे राजाचे कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, पेशवे यांनी मंदिरांचे रक्षण आणि पुनर्निर्माण केले आहे.