धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने धारुहेरा येथील बेस्टेक सिटी मंदिरात २६ जून ते ३० जून या कालावधीत ५ दिवसांचे विनामल्य ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले.
सनातन संस्थेच्या वतीने धारुहेरा येथील बेस्टेक सिटी मंदिरात २६ जून ते ३० जून या कालावधीत ५ दिवसांचे विनामल्य ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले.
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथील ब्रिजलक्ष्मी धाममध्ये रहाणार्या मुलांमध्ये चांगल्या मूल्यांचे संवर्धन करता यावे, यासाठी ५ दिवसांच्या ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्गा’चे आयोजन करण्यात आले.
‘सनातन संस्था’ आणि ‘मंदिर महासंघ’ यांच्या वतीने शहरातील पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात ५ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्गाचे’ आयोजन करण्यात आले होते. ९ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी ६ ते १० मे २०२६ या कालावधीत सकाळी ९ ते १२ या वेळेत घेण्यात आलेल्या या संस्कार वर्गात ४० मुलांनी सहभाग घेतला.
अतिरिक्त कार्यभार, विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि कौटुंबिक दायित्व यांमुळे आज शिक्षकांचा मानसिक ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ बाह्य उपायांनी नव्हे, तर नामजप, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांनी तणावावर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवता येते.
आपण सर्वजण आनंदाच्या शोधात असतो; मात्र सुखाच्या मागे धावल्यामुळे जीवन तणावग्रस्त होते. अध्यात्म हे एक शास्त्र असून त्याप्रमाणे आचरण केल्यामुळेच आपण खर्या अर्थाने आनंदी राहू शकतो. सध्याच्या आपत्काळात साधना आणि नामस्मरण यांविना पर्याय नाही. अध्यात्म ही आनंदी जीवन जगण्याची सुंदर कला आहे, जी शाळा-महाविद्यालयांत शिकवली जात नाही.
रामनाम संकीर्तनाचे स्वरूप : रामराज्यासाठी प्रार्थना : ५ मिनिटे, श्रीरामनामाचा जप : ५० मिनिटे, हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा : ५ मिनिटे
एका पालकांनी सांगितले, मुलांना बालसंस्कारवर्गात सहभागी होण्यासाठी वेगळी आठवण करून देण्याची आवश्यकता भासत नाही. ती स्वतःहून उत्साहाने वर्गात उपस्थित रहातात.’पालकांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून माझ्या लक्षात आले, ‘बालसंस्कारवर्ग मुलांवर संस्कार करणे, त्यांचे चारित्र्य घडवणे आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती होणे’, यांसाठी अत्यंत प्रभावी ठरत आहेत.’
सनातन संस्थेच्या वतीने फरीदाबाद (हरियाणा) येथील सेक्टर २९ मधील श्री सनातन धर्म मंदिरात ‘बालक-पालक परिचय’ समारंभ २५ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुलांनी उत्साहाने सनातनच्या बालसंस्कार वर्गात शिकवलेल्या बोधप्रद कथा, आध्यात्मिक खेळ आणि भावार्थासह श्लोक सादर केले.
महिलांचे सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने मुलांना ‘आई’ म्हणण्याचा आग्रह धरून आजच सक्षमीकरणाच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले पाहिजे. ‘आई’ हा शब्द अर्थपूर्ण आहे.
आत्मविश्वासाचा अभाव आणि मनावर उमटलेले संस्कार हे तणावाला ९० टक्के कारणीभूत ठरत आहेत. – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था