सांप्रत बौद्ध राष्ट्र असूनही भगवान श्रीविष्णूवरील श्रद्धा दर्शवणार्‍या महाभारत आणि रामायण यांतील प्रसंगांवर आधारलेले कंबोडियाचे पारंपरिक ‘अप्सरा नृत्य’ !

महाभारतात ज्या भूभागाला ‘कंभोज देश’, असे संबोधले आहे, तो म्हणजे आताचा कंबोडिया देश ! येथे १५ व्या शतकापर्यंत हिंदू रहायचे. ‘खमेर नावाचे हिंदु साम्राज्य येथे वर्ष ८०२ ते १४२१ पर्यंत होते’, असे म्हटले जाते.

कंबोडिया येथे कुणीही ओळखीचे नसतांना ईश्‍वराच्या कृपेने प्रवासातच एका व्यक्तीने साहाय्यासाठी येणे, ही भगवंताच्या अस्तित्वाची अनुभूती !

बाली (इंडोनेशिया) येथून आम्ही सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासह कंबोडियाला जात होतो. त्या वेळी प्रवासात क्वालालंपूर येथे काही घंटे थांबावे लागले. तेथून कंबोडियाची राजधानी नोम फेन येथे जायचे होते.

विदेशी व्यक्तींचा स्पर्श झाल्यानंतर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना जाणवलेला सात्त्विक स्पर्श अन् असात्त्विक स्पर्श यांतील भेद !

भारतीय पद्धतीने साडी नेसलेल्या आणि स्वतः दैवी आकर्षणाने ओतप्रोत असलेल्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ यांना पाहून अनेक विदेशी पर्यटक त्यांच्याकडे आकर्षित होतात.

सप्तलोकांच्या संकल्पनेवर आधारलेले आणि प्रगत स्थापत्यशास्त्राचा नमुना असलेले इंडोनेशियातील प्रंबनन् म्हणजेच परब्रह्म मंदिर !

मंदिराचा परिसर पुष्कळ मोठा आहे, तसेच सर्व मंदिरांचा कळस पुष्कळ उंच आहे. विशेष म्हणजे मंदिरांच्या बांधकामात कुठेही सिमेंटचा वापर झालेला दिसत नाही. सगळीकडे ‘इंटरलॉकिंग’ पद्धत आहे. दगड एकमेकांमध्ये विशिष्ट प्रकारे अडकवले आहेत. अशा रचनेमुळे मंदिर सात्त्विक दिसते.

बाली येथील जागृत ज्वालामुखी असलेला अगुंग पर्वत आणि समुद्रमंथनात दोरीचे कार्य केलेल्या वासुकी नागाचे बेसाखी मंदिर यांची वैशिष्ट्ये !

‘अगुंग पर्वत’ म्हणजे धगधगता आणि अखंड जागृत ज्वालामुखी आहे. येथे प्रत्येक ५-१० मिनिटांनी राखेचा विस्फोट होत असतो. ३ सहस्र १०५ मीटर उंच पर्वत असलेला हा ज्वालामुखी गेले वर्षभर जागृत आहे. त्यामुळे अनेक वेळा बाली द्वीपावर आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. बाली येथील हिंदू या पर्वताला पवित्र मानतात.

इंडोनेशियातील रहदारीच्या चौकांत रामायण आणि महाभारत काळातील पौराणिक कलाकृती, तसेच लोककलांमध्येही हिंदु पौराणिक कथांचा समावेश !

जकार्ता हे शहर मुसलमानबहुल आहे, तरीही तेथील राष्ट्रीय स्मारकाच्या समोरील चौकात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाची मोठी कलाकृती पहायला मिळते.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील ईश्‍वरी चैतन्यामुळे इंडोनेशियामध्ये लोक त्यांच्याकडे स्वत:हून आकर्षिले जाणे !

‘योग्यकर्ता’ या शहरात सुलतानाच्या राजवाड्यात गेल्यावर तेथील महिला गाईडने सद्गुरु काकूंकडे पाहिले आणि ‘तुम्ही ‘राणी’सारख्या दिसता’, असे म्हटले.

इंडोनेशिया येथील अभ्यास दौर्‍याचा वृत्तांत

इंडोनेशिया देशातील बाली बेटात हिंदू बहुसंख्येने रहतात. तेथे हिंदूंचे सर्व सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात; मात्र हे सण साजरे करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. गुढीपाडव्याचा सण नववर्षारंभ म्हणून ‘न्येपी’ या नावाने साजरा केला जातो.

सनातन संस्थेकडून महाशिवरात्रीनिमित्त देशभर ६५० हून अधिक ठिकाणी धर्मप्रसार

सनातन संस्थेच्या वतीने देशभरातील विविध शिवमंदिरांमध्ये ६५० हून अधिक ठिकाणी ग्रंथ आणि सात्त्विक साहित्यांचे वितरण कक्ष, तसेच शिवाची अध्यात्मशास्त्रीय माहिती सांगणारे फलक लावून धर्मप्रसार करण्यात आला.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात एकदा अवश्य जा, पुन्हा जावेसे वाटेल, असा भगवंत तेथे आहे ! – बाळासाहेब बडवे, पत्रकार आणि संपादक दैनिक पंढरी संचार

गोव्यातील फोंड्याजवळ असलेल्या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात प्रत्येकाने एकदा अवश्य जा. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचे तेथे साक्षात दर्शन घडते.