सेवेतील बारकावे शिकवून भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करायला शिकवणारे प.पू. डॉक्टर !

एखादे बांधकाम करायचे म्हटले की, त्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो; पण ते बांधकाम परिपूर्ण आणि भावपूर्ण केल्यासच कौशल्यपूर्ण होऊन त्यात जिवंतपणा येऊन शकतो, हे आम्हाला शिकवले, ते केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने केलेले कार्य

‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’ म्हणजे ‘शिष्याचे परममंगल (मोक्षाप्राप्ती) हे केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते.’ शीघ्र गुरुप्राप्ती होण्यासाठी आणि गुरुकृपा सातत्याने होत रहाण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘गुरुकृपायोग’ हा सोपा साधनामार्ग सांगितला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रक्तातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी !

संतांचे जीवन अद्भुत असते. संत जसजसे ईश्‍वराच्या समीप जातात, तसतसे त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक गुणवैशिष्ट्यांत पालट होत जातात. संतांच्या चैतन्याचा परिणाम त्यांच्या वापरातील वस्तूंवरही होतो. अशा दैवी पालटांचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग होईल. या उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःचा देह, वस्तू आणि वास्तू यांमधील पालटांचा अभ्यास केला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना स्वतःच्या जीवितकार्याविषयी वाटणारी कृतार्थता !

अ. साधनेत देवाच्या दिशेने १ पाऊल पुढे टाकले की, देव आपल्या दिशेने १० पावले टाकतो, याची अध्यात्माच्या सर्वच क्षेत्रांत आलेली अनुभूती मी वयाच्या ४३ व्या वर्षी (वर्ष १९८५ मध्ये) साधनेकडे वळलो. ४५ व्या वर्षी (वर्ष १९८७ मध्ये) मला प.पू. भक्तराज महाराज (बाबा) यांच्या रूपात गुरुप्राप्ती झाली. वर्ष १९९० मध्ये प.पू. बाबांनी देश-विदेशात सर्वत्र धर्मसार करा, असे सांगितले. त्यासाठी त्यांनी आवश्यक … Read more

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा गुरुकार्याविषयी असलेला कृतज्ञताभाव !

माझ्याकडून जे काही कार्य झाले, ते माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज (बाबा) यांच्या आशीर्वादाने झाले. याची दोन उदाहरणे येथे दिली आहेत. अ. गुरूंनीच हे सर्व माझ्याकडून करवून घेतले आहे ! वेळोवेळी बाबा जे शिकवायचे, ते सर्व मी लिहून ठेवायचो. बाबा मला म्हणायचे, या लिखाणाचा तुम्हाला उपयोग नाही (कारण आता तुम्ही शब्दातीत माध्यमातून शिकू शकता); पण इतरांना होईल. मी अध्यात्मावर … Read more

विविध योगमार्ग आणि गुरुकृपायोग यांनुसार जिवांकडून कलियुगात साधना करवून घेणारी गुरुमाऊली !

‘श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी अवतारी कार्य केले. तसेच कार्य या कलियुगात प.पू. डॉक्टर स्वतः नामानिराळे राहून लीलया करत आहेत. प.पू. डॉक्टरांनी हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी निवडक जिवांना आपल्यासमवेत आणलेच आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी असे घडवले !

‘वर्ष १९८७ ते १९९० या कालावधीत प.पू. डॉक्टरांचे ३ – ४ अभ्यासवर्ग गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्या वेळी मी (श्री. प्रकाश जोशी) आणि श्री. गुरुनाथ बोरकर यांनी त्याचे आयोजन केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून बालपणीही प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याची अनुभूती

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणे अवतारी देहातूनही बालपणीपासूनच चैतन्याचे प्रक्षेपण होत असते. अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींना, तसेच सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणार्‍यांना ते चैतन्य जाणवते.

शीघ्र गतीने अध्यात्मप्रसार होण्यास्तव प.पू. डॉक्टरांनी केलेली ध्वनीचित्रीकरण सेवेची निर्मिती आणि त्यातून साधकांची साधना व्हावी, यासाठी विविध माध्यमांतून दिलेली शिकवण !

दूरचित्रवाहिन्या आणि संगणकीय तंत्रज्ञान भारतात वेगाने येऊ लागले आहे, हे प.पू. डॉक्टरांच्या दृष्टोत्पत्तीस होतेच. या दृक्-श्राव्य माध्यमांचा जनमानसावरील पगडा वाढत होता. या माध्यमांद्वारे प्रसार केल्यास सर्वसामान्य व्यक्तीला कोणतेही सूत्र आकलन होण्यास आणि मनाची पकड घेण्यास सोपे जाते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वत:तील शिवतत्त्वाची घेतलेली साक्ष म्हणजे त्यांना ऐकू आलेला नाद !

परात्पर गुरूंविषयी सांगायचे झाले, तर ‘सगुण-निर्गुण भेदाभेद कर्म हेच खरे वर्म’ असे वर्णन करू शकतो. आजच्या या आपत्काळात सगुण स्तरावर साधकांना आवश्यक मार्गदर्शन करणारे आणि निर्गुण स्तरावर सर्व करवून घेणारे दुसरे, अशी दोन वेगवेगळी तत्त्वे नसून ते एकच परात्पर गुरु डॉ. आठवलेच आहेत.