साधकांना भावविश्‍वात नेणारे भावसत्संग !

भावनिर्मितीसाठी घेतल्या जाणा-या अशा प्रयोगांमुळे साधक अंतर्मुख होतो, तसेच देवाचे अस्तित्व अनुभवून तात्पुरत्या कालावधीकरता का असेना, भावस्थितीची अनुभूती घेतो. साधकाच्या अंतर्मनातील विचार प्रतिक्रिया, तसेच स्वभावदोष आणि अहं यांसंबंधीचे विचार बाहेर पडू लागतात.

साधिकांनी केलेले भावजागृतीसाठीचे प्रयत्न

स्वत:मध्ये भाव निर्माण होणे हे ईश्वरप्राप्तीची तळमळ, अंतःकरणात ईश्वराबद्दल निर्माण झालेले केंद्र, प्रत्यक्ष साधना या घटकावर अवलंबून असते. कृती बदलली की, विचार बदलतात आणि विचार बदलले की, कृती बदलते. या तत्त्वानुसार मन अन् बुद्धी या स्तरावर सतत कृती करत राहिल्यास भाव लवकर निमार्र्ण होण्यास साहाय्य होते.

जीवनावर आणि साधनेवरही विपरित परिणाम घडवणार्‍या भीतीचा संस्कार पुसून टाकण्यासाठी सौ. श्‍वेता क्लार्क यांनी केलेले प्रयत्न आणि श्रीकृष्णाने त्यांना केलेले साहाय्य

माझ्यामधे भीती वाटणे आणि त्यासमवेतच न्यूनगंड आणि राग येणे, हे अहंचे पैलू प्रबळ आहेत. मी भीती वाटणे, या दोषाच्या मुळाशी जाऊन त्याची व्याप्ती काढू शकले. गेल्या वर्षभरात मी हा दोष घालवण्यासाठी प्रयत्न करत असून श्रीकृष्णाच्या साहाय्यामुळे आणखी योग्य दिशेने त्यावर मात करू शकत आहे.

कर्मसाफल्यासाठी आवश्यक घटक

कर्माच्या सफलतेचे हे गूढरहस्य केवळ त्रिकालज्ञानी संतच जाणू शकतात. काही वेळा केवळ काळच सर्व प्रश्‍नांची उत्तरे देऊ शकतो. त्यामुळे विशिष्ट काळ संपेपर्यंत एखादे कर्म कसे होते ?, याचा निर्णय घेण्यात दिरंगाई दिसत असली, तरी ती दूरदृष्टीने योग्यच असते.

नमस्काराची योग्य मुद्रा केल्याने अभ्यासात सुधारणा होणे, तसेच मनःशांती मिळत असल्याने मित्रांनाही तसे करण्यास सुचवणे

मला नमस्काराची योग्य मुद्रा केल्यावर मनःशांती मिळत असल्यामुळे माझ्या वयोगटातील सर्व मित्रांना मी तसे करण्यास सुचवतो.

साधकांनो, साधनेच्या प्रयत्नांमध्ये मागे मागे राहू नका, नाहीतर प्रगतीत मागे मागे रहाल !

काही साधक चुका होतील, या भीतीमुळे एखादी सेवा करण्यास किंवा एखाद्या सेवेचे दायित्व घेण्यास कचरतात. काही साधक मला हे जमणार नाही, असा चुकीचा ग्रह मनाशी बाळगतात; त्यामुळे क्षमता असूनही त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार सेवा करणे जमत नाही.

मृत्यूनंतरच्या जीवनाचा विदेशातील काही रुग्णांनी घेतलेला प्रत्यक्ष अनुभव

मृत्यूनंतरही जीवनाचे अस्तित्व असल्याचे अनुभव आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी आतापर्यंत मांडले आहेत; आता मात्र मृत्यूनंतरही जीवन असू शकते, ही गोष्ट सिद्ध करता येऊ शकेल, असे पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले आहेत..

देवघरात मृत व्यक्तीचे छायाचित्र लावून त्याचे पूजन का करू नये ?

कोणत्याही व्यक्तीने स्वतःचे मृत झालेले नातेवाईक यांचे छायाचित्र कधीही देवघरात लावू नये; कारण त्यामुळे आर्थिक दौर्बल्य येते किंवा घरात होणारे विवाह उशिरा होण्यास ते कारणीभूत ठरू शकते.. – श्री. अरविंद वझे (मासिक ग्रहवेध, दीपावली १९९६)

शैक्षणिक क्षेत्रातील परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेले गुणवंत आणि अध्यात्मशास्त्रात प्रगती झालेले उन्नत यांच्यातील भेद

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. प्रत्येक क्षेत्रातच स्पर्धा अनिवार्य झालेली आहे. शिक्षणक्षेत्र तर त्याची जन्मभूमीच म्हणावी लागेल. अशा या शिक्षणक्षेत्रात विविध परीक्षांमध्ये गुणवत्ता सूचीत येणे, हे फार मानाचे मानले जाते. त्याचा लाभ त्या व्यक्तीच्या उत्तरार्धातील जीवनावर होत असतो.