भक्तांद्वारे मंदिराचे उत्कृष्ट व्यवस्थापन पहाणारे शिवशंकर पाटील यांचा आदर्श सर्वच मंदिर विश्वस्तांनी घ्यावा ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

कथित गैरव्यवस्थापनाच्या नावाखाली महाराष्ट्र सरकारने राज्यातील अनेक मोठी मंदिरे स्वतःच्या नियंत्रणात घेतली. अनेक मंदिरांतील भक्तांचे विश्वस्त मंडळ विसर्जित केले. त्या वेळी भक्तांच्या माध्यमांतून सचोटीने कार्य करून मंदिर व्यवस्थापन उत्कृष्ट सांभाळून मंदिर सरकारीकरणाला पर्याय निर्माण करणारे शेगाव येथील ‘श्री गजानन महाराज संस्थान’चे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांनी सर्व हिंदू आणि मंदिर विश्वस्त यांच्यासमोर आदर्श निर्माण केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने ४५० गावांमध्ये भूस्खलन

पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक १०२ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण १ सहस्र १८९ हेक्टर भूमी भूस्खलनामुळे बाधित झाली आहे.

गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी प्रकाशित झालेले सनातनचे ग्रंथ आणि पहिले ‘इ-बूक’ !

व्यष्टी आणि समष्टी साधना, आध्यात्मिक त्रास आणि आपत्काळाच्या अनुषंगाने उपाय या विषयांवर आधारित ग्रंथ हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत !

गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदु धर्माची महानता जगात प्रस्थापित करणारे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात रामकृष्ण परमहंस गुरु म्हणून आले आणि त्यांच्याकडून महान कार्य करवून घतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून समर्थ रामदासस्वामी यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

सत्तरी तालुक्यात पुरामुळे सर्वाधिक हानी : अनेक गावांचा शहरापासून संपर्क तुटला

अतीवृष्टीमुळे राज्यातील म्हादई, वाळवंटी, रगाडा, शापोरा आदी नद्यांचे पाणी सत्तरी आणि डिचोली तालुक्यांमधील शेती-बागायतींमध्ये शिरले आहे. सर्वाधिक हानी सत्तरी तालुक्यात झाली आहे. पैकुळ, सत्तरी आणि शेळ-मेळावली येथील पूल कोसळले आहेत. अडवई, सत्तरी आणि वाळपई पालिका क्षेत्रातील काही घरे कोसळली आहेत. वाळपई शहरातील पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने अन्य गावांशी संपर्क तुटला आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गुरुपूजन !

सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार ‘भगवान श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांना नमस्कार करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’, अशा एकत्रित वैशिष्ट्यपूर्ण चित्राचे पूजन केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मराठी, गुजराती, कन्नड अन् मल्ल्याळम् या भाषांत ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या वेळी श्री व्यासपूजन, तसेच सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘भक्तवात्सल्य आश्रमा’त प.पू. भक्तराज महाराज यांच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला आजपासून प्रारंभ !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या इंदूर येथील भक्तवात्सल्य आश्रमामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे

स्वतःचे मृत्यूपत्र (इच्छापत्र) सिद्ध करा आणि त्यामुळे होणारे लाभ लक्षात घेऊन संभाव्य अडचणी टाळा !

सर्व घटकांचा विचार करता ‘आपण संपूर्ण आयुष्यभर कष्ट करून जी संपत्ती (स्थावर आणि चल (धन, शेअर्स, सोने, चांदी आदी संपत्ती) मिळवली, तिचा उपभोग आपल्या पश्चात ‘कुणी आणि कसा घ्यावा ?’ याविषयीचा निर्णय आपण इच्छापत्राद्वारे (मृत्यूपत्राद्वारे) स्वतःच स्पष्ट केल्यास ‘त्या मालमत्तेचे पुढे काय होईल ?’ याची काळजी आपल्याला उरत नाही.

जर्मनीमध्ये पुरामुळे ८१ जणांचा मृत्यू, तर १०० हून अधिक लोक बेपत्ता

जर्मनीमध्ये मुसळधार पावसामुळे आलेेल्या पुरामुळे ८१ जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.