
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने ४५० गावांमध्ये भूस्खलन झाले असून यात पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक १०२ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण १ सहस्र १८९ हेक्टर भूमी भूस्खलनामुळे बाधित झाली आहे. यामध्ये ५६४ हेक्टर शेतभूमी, तर ६२५ हेक्टर बिगरशेती असणार्या भूमीची हानी झाली आहे. साधारणत: साडेदहा सहस्र शेतकर्यांना याचा फटका बसला आहे. यामुळे शेतीची मोठी हानी झाली असून याची गंभीर नोंद घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूस्खलनाचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.
या संदर्भात जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे म्हणाले, ‘‘सध्या भूस्खलन झालेल्याचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाच्या माध्यमातून युद्धपातळीवर चालू आहे. अद्यापही पंचनामे चालू असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.’’
उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !
रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची...
‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार, २ लाखांहून अधिक लोकांना फटका
युरोपात युद्धाचे ढग गडद !
२४० कि.मी. वेगात अमेरिकी किनारपट्टीला धडकले ‘इयान’ चक्रीवादळ !
अमेरिकेतील दुष्काळाचा कृषी उत्पन्नावर परिणाम, तर युरोपातही अन्नधान्य टंचाई होण्याची चिन्हे !