समाजातील प्रत्येक घटनेकडे वार्ता म्हणून पाहून ती जनप्रबोधनाच्या दृष्टीने सिद्ध केल्यास आपली समष्टी साधना चांगली होईल ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था
आज पत्रकारिता समाजातील प्रभावशाली माध्यम झाले आहे. समाजात घडणार्या प्रत्येक घटनेच्या माहितीला योग्य असा दृष्टीकोन देणे आणि तो जनमानसापर्यंत पोचवून त्याद्वारे जागृती करणे यांसाठी त्याप्रमाणे वार्ता सिद्ध करणे, हे आज अत्यंत महत्त्वाचे आहे.