समाजातील प्रत्येक घटनेकडे वार्ता म्हणून पाहून ती जनप्रबोधनाच्या दृष्टीने सिद्ध केल्यास आपली समष्टी साधना चांगली होईल ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आज पत्रकारिता समाजातील प्रभावशाली माध्यम झाले आहे. समाजात घडणार्‍या प्रत्येक घटनेच्या माहितीला योग्य असा दृष्टीकोन देणे आणि तो जनमानसापर्यंत पोचवून त्याद्वारे जागृती करणे यांसाठी त्याप्रमाणे वार्ता सिद्ध करणे, हे आज अत्यंत महत्त्वाचे आहे.

सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत ‘ऑनलाईन प्रथमोपचार शिबिर’ पार पडले !

या शिबिरात मूलभूत जीवित रक्षण साहाय्य, हृदय-श्वसन पुनरुज्जीवन तंत्राचा वापर, सुरक्षित आरामदायी स्थिती, पाठीच्या दुखापतीमध्ये प्रथमोपचार करतांना कशी काळजी घ्यावी, त्रिकोणी पट्टीच्या साहाय्याने झोळी बांधणे, रस्त्यावरच्या अपघातामध्ये रुग्णाचे शिरस्त्राण काढणे, रुग्णाला इतरत्र वाहून नेण्याच्या विविध पद्धती, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

गुरुकृपायोगानुसार साधना करून हिंदु राष्ट्राचे साक्षीदार आणि भागीदार होऊया ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

प्रत्येक मनुष्यावर पितृ ऋण, गुरुऋण, ऋषिऋण आणि समाजऋण असते. आई-वडिलांची सेवा करून त्यांचे ऋण फेडता येते. ऋषींनी सांगितलेली साधना करून त्यांचे ऋण फेडता येते. गुरूंनी सांगितलेली साधना समाजाला सांगून म्हणजे समष्टी साधना करून समाजऋण आणि गुरुऋण फेडता येते. यासमवेत समष्टी साधनेसह व्यष्टी साधना करणेही आवश्यक आहे.

सनातन संस्थेच्या वतीने ‘तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी (टीकेपी) आध्यात्मिक समिती’च्या महिलांसाठी ‘नामजपाचे महत्त्व’ या विषयावर पार पडले ‘ऑनलाईन’ व्याख्यान !

कोची कालिकत येथील ‘तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी (टीकेपी) आध्यात्मिक समिती’च्या संचालिका सौ. स्नेहलता मालपाणी यांनी त्यांच्या समितीच्या महिलांसाठी ‘नामजपाचे महत्त्व’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचन आयोजित केले होते.

साधकांनो, प्रत्येक क्षण साधनेसाठीच वापरून साधनेची फलनिष्पत्ती वाढवा आणि आध्यात्मिक उन्नतीचे ध्येय शीघ्र साध्य करा !

एकदा गेलेला वेळ पुन्हा मिळवता येत नाही’, या तत्त्वानुसार साधकांनी एकही क्षण न दवडता साधनेसाठी झोकून देऊन प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला छायाचित्रणासाठी (‘फोटोग्राफी’साठी) विविध उपकरणे आणि साहित्य यांची आवश्यकता !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ वैज्ञानिक भाषेत आध्यात्मिक संशोधन करण्याचे एकमेवाद्वितीय आणि ऐतिहासिक कार्य करत आहे. या विश्‍वविद्यालयाचे काही साधक संतांच्या मार्गदर्शनानुसार विविध ठिकाणी प्रवास करून भारतीय संस्कृतीच्या अनमोल ठेव्याचा संग्रह करत आहेत.

धरणक्षेत्रात रहाणार्‍यांनो, स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी सतर्क रहा !

पावसाळा चालू झाल्यावर धरणे फुटण्याच्या घटना देशभरात कुठे ना कुठे घडत असतात. विशेष म्हणजे या धरणांच्या सुरक्षिततेचे परीक्षण करण्यासाठी स्वतंत्र शासकीय विभाग आहेत; पण या विभागांनी धरणे फुटण्यापूर्वीच जनतेला सतर्क करून हानी रोखली, असे कधी घडत नाही.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या धर्मकार्यात सहभागी होऊन स्वतःचा उद्धार करून घ्या ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘ऑनलाईन कोरोना महामारीच्या विरुद्ध मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर कसे लढायचे ?’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

आपत्काळात आपण केवळ साधनेच्याच बळावर तरून जाऊ शकतो ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

साधनेमुळे आपल्याला भगवंताचे कृपाछत्र मिळते आणि येणार्‍या आपत्काळात आपण केवळ साधनेच्याच बळावर तरून जाऊ शकतो, असे मार्गदर्शन सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांनी नुकत्याच झालेल्या दोन दिवसांच्या ‘ऑनलाईन’ युवा साधना शिबिरात केले.

सनातनची सर्वांगस्पर्शी ५ सहस्र संख्येची ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

विविध भारतीय भाषांचे आणि इंग्रजीचे ज्ञान असणारे साधक, वाचक अन् हितचिंतक यांना आध्यात्मिक ज्ञानदानाच्या कार्यात सहभागी होण्याची अमूल्य संधी !