‘विश्वमांगल्य सभे’च्या प्रांत अधिवेशनात सनातन संस्थेच्या साधिका सौ. माहेश्वरी सरनोबत यांचा सत्कार

‘विश्वमांगल्य सभा’ याच्या वतीने समाजाप्रती नि:स्वार्थ सेवाभाव आणि चिंतनशील मातृत्व जपत ‘शौर्य क्षेत्रा’त केलेल्या कार्याविषयी सनातन संस्थेच्या साधिका सौ. माहेश्वरी सरनोबत यांचा ‘सप्तमातृका सन्माना’च्या अंतर्गत ‘शक्तीरूपेण संस्थिता’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

वाराणसीतील श्री काशीविश्वनाथ मंदिराच्या पुजार्‍यांकडून सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा सन्मान !

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी नुकतीच येथील श्री काशीविश्वनाथ मंदिरात काशीविश्वेश्वराचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिराचे आचार्य श्री. टेक नारायण उपाध्याय यांनी सद्गुरु जाधव यांचा, तसेच त्यांचे कुटुंबीय यांचा भावपूर्ण सन्मान केला. या वेळी पुजारी उपाध्याय म्हणाले, ‘‘तुमच्यासारख्या सद्गुरु संतांमुळे ही भारतभूमी टिकून आहे.’’

कांची कामकोटी पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती स्वामी यांची भेट घेऊन सनातनच्या साधकांनी घेतला आशीर्वाद !

कांची कामकोटी पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती स्वामी यांची सनातनच्या साधकांनी ८ एप्रिल या दिवशी भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. माटुंगा येथील श्री शंकर मठामध्ये ते एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले असतांना साधकांनी त्यांची भेट घेतली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे योगी निरंजन नाथ यांची सनातनच्या मिरज आश्रमास सदिच्छा भेट !

मिरज येथील ब्राह्मणपुरीमधील सनातन आश्रमाला आळंदी देवाची येथील ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती’चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी ५ एप्रिल या दिवशी सायंकाळी ६ वाजता सदिच्छा भेट दिली.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांना “धर्म अलंकार पुरस्कार” आणि “माँ पटन देवी सन्मान” ने सन्मानित

येथे ४ ते ६ एप्रिल या कालावधीत आयोजित ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू आणि तंत्र संमेलना’त सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) जयंत बाळाजी आठवले यांना धर्म आणि आध्यात्म या क्षेत्रांतील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी ‘‘धर्म अलंकार पुरस्कार’’ आणि “माँ पटन देवी सन्मान” देऊन सन्मानित करण्यात आले.

खोपोली येथे वाढदिवसानिमित्त उद्योजक यशवंत साबळे यांच्याकडून सनातन संस्थेच्या लघुग्रंथांचे वितरण !

वाढदिवस म्हणजे केवळ जल्लोष आणि पाश्चात्त्य प्रथांचे अंधानुकरण नसून तो समाजहित आणि धर्मप्रसार यांचा भाग असू शकतो, याचा आदर्श खोपोलीतील उद्योजक श्री. यशवंतशेठ लक्ष्मण साबळे यांनी घालून दिला आहे. श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधून आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सनातन संस्था प्रकाशित ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ आणि हनुमानचालिसा’ या लघुग्रंथांच्या ५०० प्रतींचे वितरण केले.

गौतम खट्टर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन सनातन संस्थेने केले नव्हते !

गेल्या काही दिवसांपासून श्री. गौतम खट्टर यांनी फ्रान्सिस झेविअरच्या संदर्भात केलेल्या विधानावरून गोव्यात जाणीवपूर्वक धार्मिक तणाव निर्माण केला जात आहे. या वादाचा आडोसा घेऊन काही समाजकंटक सनातन संस्थेला विनाकारण लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत.

राज्यस्तरीय काव्यसंमेलनात सनातन संस्थेचे मुंबईतील साधक रोहन पातेने यांचा ‘काव्यरत्न पुरस्कारा’ने सन्मान !

दादर येथील सांस्कृतिक सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या ‘राज्यस्तरीय त्रिवेणी काव्यसंमेलना’त सनातन संस्थेचे मुंबई येथील साधक श्री. रोहन रवींद्र पातेने यांचा ‘काव्यरत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

जैन मंदिरांना सिलिंडर उपलब्ध करून देण्याच्या मागणीवरून वादंग निर्माण करणे चुकीचे ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

मंदिरांचे रक्षण करणे, हे राजाचे कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, पेशवे यांनी मंदिरांचे रक्षण आणि पुनर्निर्माण केले आहे.

हिंदूंनो, काळानुसार साधना म्हणून श्रीरामरक्षा आणि मारुतिस्तोत्र यांचे प्रतिदिन पठण करा !

आपत्काळात स्वतःसह, कुटुंबीय, गाव आणि राष्ट्र यांचे रक्षण व्हावे, तसेच आगामी रामराज्यासाठी उपयुक्त असे रामभक्त निर्माण व्हावेत, या व्यापक उद्देशाने प्रतिदिन एकवेळा श्रीरामरक्षा आणि मारुतिस्तोत्र अथवा हनुमानचालिसा म्हणावी.