
मिरज – येथील ब्राह्मणपुरीमधील सनातन आश्रमाला आळंदी देवाची येथील ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती’चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी ५ एप्रिल या दिवशी सायंकाळी ६ वाजता सदिच्छा भेट दिली. या वेळी श्री. संतोष देसाई यांनी त्यांना सनातन संस्थेच्या चालू असलेल्या ‘राष्ट्र आणि धर्म’ कार्याची सविस्तर माहिती दिली, तसेच त्यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव-संकल्प रामराज्याचा’ हा ग्रंथ भेट दिला. या वेळी ह.भ.प. धनंजय दीक्षित, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री द्वारकाधीश मुदडा, सनातनच्या साधिका श्रीमती मधुरा तोफखाने, डॉ. (कु.) शिल्पा बर्गे, साधक श्री. योगेश जोशी आदी उपस्थित होते.
‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती’चे विश्वस्त योगी निरंजन नाथ गुरु शांतीनाथ पुढे म्हणाले की, समुद्रमंथनानंतर देवांना देवत्व प्राप्त झाले; परंतु त्यासाठी महादेवांना विषप्राशन करावे लागले. यातूनच सन्मार्गावर चालणे, साधना करणे आणि संघटन बांधणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवणे यांसाठी अपार कष्ट घ्यावे लागते अन् त्याग करावा लागतो, हे आपल्याला शिकायला मिळते. आपण मूर्तीपूजा करतो, याचाच अर्थ आपण दगडातही देव पहातो. हीच आपल्या संस्कृतीची महानता आहे. ही नित्यनूतन सनातन संस्कृतीच भारताची खरी शक्ती आहे.
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !