भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य- भारतियांचे निसर्गाशी असलेले स्नेहसंबंध !
आमच्या ऋषीमुनींनी निसर्गाच्या सान्निध्यात अनेक वर्षे साधना करून निसर्गाशी जवळीक साधली. त्यांनी निसर्गाच्या सहवासात जीवन व्यतीत करून निसर्गाशी एकरूप होऊन नैसर्गिक शक्तींची अनेक गूढ रहस्ये उकलून विश्वापुढे ज्ञानाचे नवे दालन उघडले.
