वर्धा येथे सनातन संस्थेकडून डॉ. प्रवीण तोगाडिया यांचा सत्कार

भारताला हिंदु राष्ट्र करणे, देशात गोवंश हत्याबंदीचा कायदा करणे, आपत्काळात हिंदूंचे रक्षण करणे, १ लाख ‘हनुमान चालिसा केंद्रे’ चालू करणे आदी संकल्प घेऊन ‘आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद’ तथा ‘राष्ट्रीय बजरंग दला’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांचा देशभर दौरा चालू आहे. या निमित्ताने ते वर्धा येथे आले असता…

अधिक मास निमित्त धर्मप्रसाराचे कार्य अव्‍याहतपणे करणार्‍या सनातनच्‍या आश्रमांना अन्‍नदान करून पुण्‍यसंचयासह आध्‍यात्मिक लाभही मिळवा !

भारतीय संस्‍कृतीत दानधर्माला विशेष महत्त्व आहे. दानाचे धनदान, अन्‍नदान, वस्‍त्रदान, ज्ञानदान आदी प्रकार आहेत. दान हे पापनाशक असून ते पुण्‍यबळाची प्राप्‍ती करून देते. ‘या पृथ्‍वीतलावर दानधर्मासारखा दुसरा निधी (ठेवा) नाही’, असे महाभारतात सांगितले आहे.

‘विश्वमांगल्य सभे’च्या प्रांत अधिवेशनात सनातन संस्थेच्या साधिका सौ. माहेश्वरी सरनोबत यांचा सत्कार

‘विश्वमांगल्य सभा’ याच्या वतीने समाजाप्रती नि:स्वार्थ सेवाभाव आणि चिंतनशील मातृत्व जपत ‘शौर्य क्षेत्रा’त केलेल्या कार्याविषयी सनातन संस्थेच्या साधिका सौ. माहेश्वरी सरनोबत यांचा ‘सप्तमातृका सन्माना’च्या अंतर्गत ‘शक्तीरूपेण संस्थिता’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था

अतिरिक्त कार्यभार, विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि कौटुंबिक दायित्व यांमुळे आज शिक्षकांचा मानसिक ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ बाह्य उपायांनी नव्हे, तर नामजप, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांनी तणावावर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवता येते.

वाराणसीतील श्री काशीविश्वनाथ मंदिराच्या पुजार्‍यांकडून सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा सन्मान !

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी नुकतीच येथील श्री काशीविश्वनाथ मंदिरात काशीविश्वेश्वराचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिराचे आचार्य श्री. टेक नारायण उपाध्याय यांनी सद्गुरु जाधव यांचा, तसेच त्यांचे कुटुंबीय यांचा भावपूर्ण सन्मान केला. या वेळी पुजारी उपाध्याय म्हणाले, ‘‘तुमच्यासारख्या सद्गुरु संतांमुळे ही भारतभूमी टिकून आहे.’’

हिंदु म्हणून संघटित होऊनच आपण खर्‍या अर्थाने रामराज्याकडे वाटचाल करू शकतो ! – सौ. शुभा सावंत, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत म्हणाल्या, ‘‘धर्म हा भारताचा प्राण आहे; परंतु आज आपण सणांचे मूळ चैतन्य गमावून बसलो आहोत कि काय ? अशी भीती वाटते. होळीचे रूपांतर ‘रिंग डान्स’मध्ये, नवरात्रीचे ‘हॉटेलमधील गरबा’मध्ये आणि दिवाळीचे महत्त्व केवळ ‘नरकासुर’वध किंवा फटाक्यांपुरते मर्यादित राहिले आहे.

कांची कामकोटी पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती स्वामी यांची भेट घेऊन सनातनच्या साधकांनी घेतला आशीर्वाद !

कांची कामकोटी पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती स्वामी यांची सनातनच्या साधकांनी ८ एप्रिल या दिवशी भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. माटुंगा येथील श्री शंकर मठामध्ये ते एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले असतांना साधकांनी त्यांची भेट घेतली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे योगी निरंजन नाथ यांची सनातनच्या मिरज आश्रमास सदिच्छा भेट !

मिरज येथील ब्राह्मणपुरीमधील सनातन आश्रमाला आळंदी देवाची येथील ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती’चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी ५ एप्रिल या दिवशी सायंकाळी ६ वाजता सदिच्छा भेट दिली.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांना “धर्म अलंकार पुरस्कार” आणि “माँ पटन देवी सन्मान” ने सन्मानित

येथे ४ ते ६ एप्रिल या कालावधीत आयोजित ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू आणि तंत्र संमेलना’त सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) जयंत बाळाजी आठवले यांना धर्म आणि आध्यात्म या क्षेत्रांतील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी ‘‘धर्म अलंकार पुरस्कार’’ आणि “माँ पटन देवी सन्मान” देऊन सन्मानित करण्यात आले.

खोपोली येथे वाढदिवसानिमित्त उद्योजक यशवंत साबळे यांच्याकडून सनातन संस्थेच्या लघुग्रंथांचे वितरण !

वाढदिवस म्हणजे केवळ जल्लोष आणि पाश्चात्त्य प्रथांचे अंधानुकरण नसून तो समाजहित आणि धर्मप्रसार यांचा भाग असू शकतो, याचा आदर्श खोपोलीतील उद्योजक श्री. यशवंतशेठ लक्ष्मण साबळे यांनी घालून दिला आहे. श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधून आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सनातन संस्था प्रकाशित ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ आणि हनुमानचालिसा’ या लघुग्रंथांच्या ५०० प्रतींचे वितरण केले.