आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था

अतिरिक्त कार्यभार, विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि कौटुंबिक दायित्व यांमुळे आज शिक्षकांचा मानसिक ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ बाह्य उपायांनी नव्हे, तर नामजप, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांनी तणावावर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवता येते.

वाराणसीतील श्री काशीविश्वनाथ मंदिराच्या पुजार्‍यांकडून सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा सन्मान !

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी नुकतीच येथील श्री काशीविश्वनाथ मंदिरात काशीविश्वेश्वराचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिराचे आचार्य श्री. टेक नारायण उपाध्याय यांनी सद्गुरु जाधव यांचा, तसेच त्यांचे कुटुंबीय यांचा भावपूर्ण सन्मान केला. या वेळी पुजारी उपाध्याय म्हणाले, ‘‘तुमच्यासारख्या सद्गुरु संतांमुळे ही भारतभूमी टिकून आहे.’’

हिंदु म्हणून संघटित होऊनच आपण खर्‍या अर्थाने रामराज्याकडे वाटचाल करू शकतो ! – सौ. शुभा सावंत, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत म्हणाल्या, ‘‘धर्म हा भारताचा प्राण आहे; परंतु आज आपण सणांचे मूळ चैतन्य गमावून बसलो आहोत कि काय ? अशी भीती वाटते. होळीचे रूपांतर ‘रिंग डान्स’मध्ये, नवरात्रीचे ‘हॉटेलमधील गरबा’मध्ये आणि दिवाळीचे महत्त्व केवळ ‘नरकासुर’वध किंवा फटाक्यांपुरते मर्यादित राहिले आहे.

कांची कामकोटी पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती स्वामी यांची भेट घेऊन सनातनच्या साधकांनी घेतला आशीर्वाद !

कांची कामकोटी पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती स्वामी यांची सनातनच्या साधकांनी ८ एप्रिल या दिवशी भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. माटुंगा येथील श्री शंकर मठामध्ये ते एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले असतांना साधकांनी त्यांची भेट घेतली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे योगी निरंजन नाथ यांची सनातनच्या मिरज आश्रमास सदिच्छा भेट !

मिरज येथील ब्राह्मणपुरीमधील सनातन आश्रमाला आळंदी देवाची येथील ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती’चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी ५ एप्रिल या दिवशी सायंकाळी ६ वाजता सदिच्छा भेट दिली.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा पाटलीपुत्र (बिहार) येथे ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू आणि तंत्र संमेलना’त सन्मान

येथे ४ ते ६ एप्रिल या कालावधीत आयोजित ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू आणि तंत्र संमेलना’त महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना धर्म अन् अध्यात्म क्षेत्रांतील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी ‘धर्म अलंकार पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

खोपोली येथे वाढदिवसानिमित्त उद्योजक यशवंत साबळे यांच्याकडून सनातन संस्थेच्या लघुग्रंथांचे वितरण !

वाढदिवस म्हणजे केवळ जल्लोष आणि पाश्चात्त्य प्रथांचे अंधानुकरण नसून तो समाजहित आणि धर्मप्रसार यांचा भाग असू शकतो, याचा आदर्श खोपोलीतील उद्योजक श्री. यशवंतशेठ लक्ष्मण साबळे यांनी घालून दिला आहे. श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधून आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सनातन संस्था प्रकाशित ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ आणि हनुमानचालिसा’ या लघुग्रंथांच्या ५०० प्रतींचे वितरण केले.

राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !

सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ अंतर्गत राजहंसगड गावात भव्य ‘श्रीराम नामदिंडी’ उत्साही, चैतन्यमय आणि भावपूर्ण वातावरणात नुकतीच पार पडली.

सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

आपण सर्वजण आनंदाच्या शोधात असतो; मात्र सुखाच्या मागे धावल्यामुळे जीवन तणावग्रस्त होते. अध्यात्म हे एक शास्त्र असून त्याप्रमाणे आचरण केल्यामुळेच आपण खर्‍या अर्थाने आनंदी राहू शकतो. सध्याच्या आपत्काळात साधना आणि नामस्मरण यांविना पर्याय नाही. अध्यात्म ही आनंदी जीवन जगण्याची सुंदर कला आहे, जी शाळा-महाविद्यालयांत शिकवली जात नाही.

गौतम खट्टर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन सनातन संस्थेने केले नव्हते !

गेल्या काही दिवसांपासून श्री. गौतम खट्टर यांनी फ्रान्सिस झेविअरच्या संदर्भात केलेल्या विधानावरून गोव्यात जाणीवपूर्वक धार्मिक तणाव निर्माण केला जात आहे. या वादाचा आडोसा घेऊन काही समाजकंटक सनातन संस्थेला विनाकारण लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत.