महान योगी परमतपस्वी अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी !

तंजावूर, तमिळनाडू येथील श्री गणेश उपासक आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या परंपरेतील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी ! ईश्वरी संकेतानुसार ते विविध ठिकाणी यज्ञयाग करतात. गेल्या ४० वर्षांपासून त्यांचा केवळ २ केळी आणि १ पेला दूध असा आहार आहे. प.पू. रामभाऊस्वामी यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अखंड योगसाधनेद्वारे तेजतत्त्वावर प्रभुत्व मिळवले असल्याने ते प्रज्ज्वलित यज्ञकुंडात १० ते … Read more

अल्प आध्यात्मिक पातळी असतांना ज्ञानमार्गाच्या तुलनेत भक्तीमार्गाने साधना केल्यास लवकर आध्यात्मिक प्रगती होण्यामागील शास्त्र

‘कुठल्याही साधनामार्गात दोष नसून प्रत्येक मार्ग हा परिपूर्णच आहे. संबंधित मार्गाने जाणार्या व्यक्तीची प्रगती होणे, हे योग्य साधनामार्ग आणि त्यासाठी आवश्यक आध्यात्मिक पातळी, या घटकांवर अवलंबून असते.

आधुनिक वैद्यांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगणे पण २ दिवस कुलदेवी आणि श्री स्वामी समर्थ यांचा नामजप केल्यावर नैसर्गिकरित्या बाळंतपण होणे

पहिल्या दोन मुलींच्या जन्मापर्यंत मी विशेष अशी साधना करत नव्हते.

श्री नवनाथ महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

परात्पर गुरु डॉ. आठवले महान आहेत. त्यांनी आरंभलेले कार्य पूर्ण होणारच आहे. तुम्ही त्यांचे चरण सोडू नका. तुम्हाला त्याचे फळ ते नक्कीच देतील.

एका कीर्तनकारांनी ‘गुढी कशी उभारावी ?’, या संदर्भात केलेली चुकीची विधाने आणि त्याचे अध्यात्मशास्त्रानुसार केलेले खंडण !

महाराष्ट्रातील एका कीर्तनकारांनी त्यांच्या कीर्तनातून ‘गुढी कशी उभारावी ?’, या संदर्भात काही चुकीचे मार्गदर्शन केल्याचे लक्षात आले.

चुकीची खंत वाटून ती सुधारण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्‍या पू. (सौ.) सूरजकांता मेनराय आजी !

पू. आजी दायित्व असलेल्या साधकांना विचारून प्रत्येक गोष्ट करतात. वरील प्रसंगात पू. आजींचे गुरुधनाची हानी झाल्याविषयीची खंत, गांभीर्य आणि स्वतःला पालटण्याची तळमळ, शिकण्याची वृत्ती, विचारून घेण्याची वृत्ती, तत्परता, इतरांचे साहाय्य घेणे, वर्तमानात रहाणे, हे गुण देवाच्या कृपेने अनुभवता आले आणि शिकता आले.

प्रेमळ आणि प.पू. गुरुदेवांवर दृढ श्रद्धा असलेल्या जोधपूर, राजस्थान येथील पू. (सौ.) सुशीला मोदी (वय ६५ वर्षे) !

जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारच्या सेवा असतात; पण गुरुदेवांवरील अतूट श्रद्धेमुळे ग्रंथप्रदर्शन लावणे, सनातन प्रभात पाक्षिकांचे वितरण करणे अशा विविध सेवा त्या एकट्याच करतात. त्यांची मुले आणि सुना त्यांना तुम्हाला एकट्याने एवढे सगळे कसे होईल ?, असे म्हणतात. यावर त्यांचे ईश्‍वरच सगळे करवून घेतो आणि तोच माझी काळजी घेतो, हे एकच उत्तर असते. जशी मीराबाईची श्रीकृष्णावर दृढ श्रद्धा होती, तशीच त्यांचीही आहे, असे वाटते.

सनातन संस्था वैदिक संस्कृतीचे पालन करणारी आदर्श संस्था ! – योगी अरविंद, ऋषिकेश

सनातन संस्था ही धर्माप्रती आदरभाव निर्माण करणारी आणि धार्मिक मूल्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारी संस्था आहे. वैदिक सनातन संस्कृतीची जपणूक करणार्‍या या संस्थेचे समाजात अत्यंत मानाचे स्थान आहे. संस्थेच्या कार्यास माझ्या शुभेच्छा ! – योगी अरविंद, ऋषिकेश

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रक्तातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी !

संतांचे जीवन अद्भुत असते. संत जसजसे ईश्‍वराच्या समीप जातात, तसतसे त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक गुणवैशिष्ट्यांत पालट होत जातात. संतांच्या चैतन्याचा परिणाम त्यांच्या वापरातील वस्तूंवरही होतो. अशा दैवी पालटांचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग होईल. या उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःचा देह, वस्तू आणि वास्तू यांमधील पालटांचा अभ्यास केला आहे.

वैदिक धर्म आणि संस्कृती यांच्या उत्थापनासाठी तरूणांच्या सहभागाचे महत्त्व !

भगवान मनूच्या लक्षावधी वर्षांच्या समाजव्यवस्थेचा उच्छेद करण्याकरताच समाजवादी (सेक्युलर) राज्यघटना अस्तित्वात आली.