इंदूर येथील ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा’ मेळ्यात सनातन संस्थेचा सहभाग

सनातन संस्थेच्या वतीने दत्त जयंतीच्या दिवशी बांगर (देवास) आणि इंदूर येथे ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण देणारे फ्लेक्सचे फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. बांगर येथे १० डिसेंबरला झालेल्या भंडार्‍यातही हे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

वादग्रस्त जादूटोणाविरोधी कायद्याची शासकीय समिती विसर्जित न केल्यास राज्यभर आंदोलन !

तत्कालीन काँग्रेस सरकारने जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेल्या शासकीय समितीचे (PIMC) सहअध्यक्ष श्याम मानव, सदस्य अविनाश पाटील, मुक्ता दाभोलकर, माधव बागवे, छाया सावरकर आदी वादग्रस्त आहेत. त्यांच्या ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत.

श्रवणभक्तीने संगीताचा आस्वाद घेणारा रसिक भक्त खऱ्या अर्थाने जीवनमुक्त होऊ शकतो !

भगवंताविषयीचा उत्कट भाव दाटून आल्यामुळे संतांनी स्वच्छंदपणे रचलेले ‘अभंग’ हे उत्स्फूर्तपणे होणार्‍या कलेच्या आविष्काराचे मूर्तीमंत उदाहरण आहेत.

सद्गुरु सत्यवान कदम यांनी लावलेल्या ध्यानाचा त्यांच्या स्वतःवर आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

‘उच्च पातळीच्या संतांनी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसमवेत नामजपादी उपाय करण्यासाठी लावलेल्या ध्यानाचा त्यांच्या स्वतःवर आणि त्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, हे जाणण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयानेे एक चाचणी घेतली.

सनातनच्या साधकांचा समर्पण भाव आणि श्रद्धा कौतुकास्पद ! – श्री जगद्गुरु बद्री शंकराचार्य श्री विद्याभिनव श्री श्री कृष्णानंदतीर्थ महास्वामीजी

श्री महास्वामीजींनी सनातन संस्थेच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले,सनातन धर्माच्या रक्षणासाठी तुम्ही धीरोदात्तपणे कार्य करत आहात. तुम्हा सर्वांचा समर्पण भाव आणि श्रद्धा कौतुकास्पद आहे. तुमच्या कार्यास माझे आशीर्वाद आहेत.

भीषण रेल्वे अपघातातून केवळ गुरुकृपेनेच रक्षण होण्यासंदर्भात श्री. श्याम राजंदेकर यांना आलेली अनुभूती

गुरुमाऊलींनी माझ्या जिवावरचे संकट टाळण्यासाठी काय नियोजन केले, हे लक्षात येताच कोटी कोटी वेळा कृतज्ञता वाटली आणि माझ्यात शरणागत भाव निर्माण झाला. माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.

सनातनच्या कार्यास माझे आशीर्वाद ! – श्री महास्वामीजी

चेंबूर येथील श्री. हरिहरपुत्र भजन समाज मंदिरात ३ ते ११ डिसेंबर या कालावधीत श्री महास्वामीजींचा सुवर्ण जन्मजयंती महोत्सव भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा झाला.

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यास राजकारणी आणि लोकप्रतिनिधी नव्हे, तर संतच सक्षम असणे !

संतांनी सर्वस्वाचा त्याग केलेला असतो. ‘सर्व ईश्वराचेच आहे’, असा त्यांचा भाव असतो. त्यामुळे त्यांच्याकडून हिंदु राष्ट्राची स्थापना व्हायला साहाय्य मिळते.

सात्त्विक उदबत्तीमध्ये बांबूच्या काडीचा उपयोग केलेला असूनही तिच्यामुळे कोणतेही तोटे होत नसून उलट आध्यात्मिकदृष्ट्या लाभच होत असणे आणि ती उदबत्ती धर्मशास्त्राविरुद्धही नसणे

सात्त्विक उदबत्तीमध्ये बांबूची काडी असूनही ती पेटवल्यावर धूप पेटवल्यावर ज्याप्रकारे त्याच्यामध्ये जेवढी सकारात्मक ऊर्जा आढळली, जवळपास तेवढीच सकारात्मक ऊर्जा सात्त्विक उदबत्तीमध्ये आढळली.

अकोला येथे दत्त जयंती निमित्त लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जोधपूर येथील भगवतभूषण राधाकृष्ण महाराज यांची भेट

अकोला येथे दत्त जयंती निमित्त लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनात जोधपूर येथील भगवतभूषण राधाकृष्ण महाराज यांनी भेट दिली.