समर्थ रामदासस्वामी यांनी केलेले अलौकिक कार्य

समर्थ रामदासस्वामी यांनी आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी अनेक ठिकाणी मठांची स्थापना केली आणि त्यावर आपल्या विचारांशी एकनिष्ठ असणार्‍या विद्वान, राष्ट्रप्रेमी अन् त्यागी महंतांची मठाधिपती म्हणून नेमणूक केली. त्यांनी सर्व भारतभरात एकूण १ सहस्र १०० मठांची स्थापना केली. ‘हे मठ आणि महंत, म्हणजे समर्थ संप्रदायाचा पाया आहे’, असे म्हटले जाते.

हे कार्य आणि ग्रंथ सनातन धर्मासाठी अत्यंत प्रशंसनीय आहे ! – महामंडलेश्‍वर स्वामी रामगिरिजी महाराज, पंचदशनाम आवाहन आखाडा, ब्यावरा, मध्यप्रदेश

हे कार्य, फलकांवरील लिखाण आणि ग्रंथ सनातन धर्मासाठी अत्यंत प्रशंसनीय आहे. हे कार्य सर्वांनीच केले पाहिजे. आपल्याला गाय, गंगामाता आणि अन्य नद्या यांना वाचवायचे आहे. भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हायला हवे, असे प्रतिपादन पंचदशनाम आवाहन आखाड्याचे महामंडलेश्‍वर स्वामी रामगिरिजी महाराज यांनी केले.

भारतात कोरोनामुळे जून 2021 पासून प्रतिदिन २ सहस्र ३२० जण दगावण्याची शक्यता !

भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे प्रतिदिन १ सहस्र ७५० लोकांचा, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात २ सहस्र ३२० लोक प्रतिदिन मृत्यूमुखी पडू शकतात, असे ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘इंडिया टास्क फोर्स’ आयोगाच्या अहवालात म्हटले आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या सुगम प्रयत्नांनी रामराज्याची पताका फडकेल ! – रसिक पीठाधीश्‍वर महंत जन्मेजय शरण महाराज, बडास्थान (अयोध्या)

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या सुगम प्रयत्नांनी रामराज्याची पताका फडकेल. रामजन्मभूमीतही राममंदिर उभे रहात आहे. राममंदिरासह रामराज्याची स्थापना होऊन सर्वांचे सार्थक होईल. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला माझ्या शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन बडास्थान (अयोध्या) येथील रसिक पीठाधीश्‍वर महंत जन्मेजय शरण महाराज यांनी केले. येथील चालू असलेल्या कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला त्यांनी भेट दिली.

रोगराई वाढून आखातात आग लागेल आणि युद्धे होतील !

धान्य भरपूर पिकेल, चोर आणि टोळधाड यांपासून त्रास होईल. रोगराई वाढेल, आखातात आग लागेल. तेलंग देशी (आखाती) आग लागेल. युद्धे होतील, राजकारणी लोकांना त्रास होईल. खरीप आणि रब्बी पिके मुबलक प्रमाणात पिकतील. आश्‍विन आणि कार्तिक मासात देशात अराजकता माजेल, त्याचा जनतेला त्रास होईल, अशी भविष्यवाणी (संवत्सरी) संत गोदड महाराज मंदिरात पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी केली.

सनातन संस्थेच्या फिरत्या ग्रंथप्रदर्शनाला उत्तराखंड शासनाच्या कुंभमेळा प्रशासनाकडून प्रसिद्धी

कुंभमेळा प्रशासनाद्वारे देश-विदेशातील पत्रकारांना कुंभमेळ्याच्या बातम्या पुरवण्यासाठी एक व्हॉट्सअ‍ॅपचा गट बनवण्यात आला आहे  या गटात कुंभमेळा प्रशासनाद्वारे हा लेख सनातनचे साधक ग्रंथ वितरण करत असतांनाच्या छायाचित्रांसह प्रसिद्ध केला आहे.

तुमच्या कार्यामुळे सनातन धर्म बळकट होत आहे ! – आमदार आणि महामंडलेश्‍वर रविदासाचार्य श्री. सुरेश राठौर, हरिद्वार

या नगरीत तुम्ही लावलेले केंद्र धर्माविषयी ज्ञानाचे स्रोत आहे. हिंदु संस्कृती विज्ञानावर आधारित आहे. तुमच्या कार्यामुळे सनातन धर्माला बळकटी मिळत आहे. तुम्ही विज्ञानाच्या आधारावर धर्म प्रमाणित करण्याचा प्रयत्न करत आहात. त्याविषयी तुम्हाला धन्यवाद देतो, असे कौतुकोद्गार येथील ज्वालापूर विधानसभेचे भाजप आमदार आणि महामंडलेश्वर रविदासाचार्य श्री. सुरेश राठौर यांनी केले.

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात अनेक देवता असण्यामागील विश्‍लेषण

येथील प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींचा आध्यात्मिक स्तरावर विचार करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हा आश्रम आदर्श बनवला आहे. याचे एक उदाहरण म्हणजे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिर होय.

दंगलसदृश भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी स्वयंसूचना देऊन मनोबल वाढवा !

आपत्काळातील पूर, भूकंप, दंगल, महायुद्ध इत्यादी आपत्तींच्या वेळी भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मनोबल निर्माण व्हावे, यासाठी ‘स्वयंसूचना-उपचारपद्धती’चा वापर करावा. त्यामुळे मनावरील ताण दूर होईल !

येत्या आपत्काळात तरून जाण्यासाठी पूर्वसिद्धतेविषयी सांगणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘सध्या देश आणि धर्म यांच्या दृष्टीकोनातून आपत्काळ चालू आहे. नैसर्गिक आपत्ती सतत येणे, देशद्रोही आणि धर्मद्रोही यांचे प्राबल्य वाढणे, राजकीय अस्थैर्य निर्माण करणार्‍या घटना घडणे, समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताच्या शुभ कार्यामध्ये विघ्ने येणे इत्यादी आपत्काळाची भौतिक लक्षणे आहेत. अशा काळात सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन संघर्षशील होते !