
हरिद्वार – हिंदु धर्मासाठी ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्र’ आवश्यक अन् प्रशंसनीय आहे. केंद्रातील प्रबोधनपर फलकांवरील लिखाण हे अटळ सत्य आहे. येथे सांगितली जाणारी माहिती अत्यंत चांगली आहे. अनेक लोक त्याचा लाभ घेत असून हे कार्य घराघरांत पोचायला हवे. हे कार्य, फलकांवरील लिखाण आणि ग्रंथ सनातन धर्मासाठी अत्यंत प्रशंसनीय आहे. हे कार्य सर्वांनीच केले पाहिजे. आपल्याला गाय, गंगामाता आणि अन्य नद्या यांना वाचवायचे आहे. भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हायला हवे, असे प्रतिपादन पंचदशनाम आवाहन आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी रामगिरिजी महाराज यांनी केले. येथील कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’ला त्यांनी भेट दिली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.
समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी स्वामीजींना केंद्राची माहिती दिली. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी महामंडलेश्वर स्वामी रामगिरिजी महाराज यांचा सन्मान करून ‘कुंभमहिमा’ विशेषांक भेट दिला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
महाकुंभ येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला जिज्ञासू, हिंदुत्ववादी, मान्यवर आणि संत यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा महाकुंभ...
महाकुंभ मेळ्यात सनातन संस्थेच्या ‘फिरत्या वितरण कक्षां’द्वारे भाविकांमध्ये धर्मप्रचार !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र...
हरिद्वार येथील महाकुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे व्यापक धर्मप्रसार
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हिंदु संस्कृती अन् धमार्र्चरण यांची आवश्यकता समाजाला पटवून देत...