अतीवृष्टी आणि भूकंप यांमुळे हानी होण्याविषयीचे भाकीत खरे ठरले !

पुणे येथील ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्‍वर मारटकर यांचे जुलै ते सप्टेंबर २०२२ या काळातील भविष्यकथन

बाबा वंगा यांची भविष्यवाणी : सायबेरियात जीवघेण्या विषाणूचा शोध लागेल !

अन्य एका भाकितात त्या म्हणाल्या होत्या की, वर्ष २०२२ मध्ये ‘ओमुआमुआ’ नावाचा एक लघुग्रह परग्रहवासियांकडून (‘एलियन्स’कडून) पृथ्वी ग्रहावरील जीवनाचा शोध घेण्यासाठी पाठवला जाईल. त्यानंतर हे ‘एलियन्स’ पृथ्वीवरील लोकांवर आक्रमण करू शकतात.

महर्षींनी सप्तर्षी जीवनाडीपट्टीतून आपत्काळ आणि तिसरे महायुद्ध यांविषयी साधकांना जागृत करणे

गेल्या काही वर्षांपासून भारतभूमीतील संत-महात्मे, सिद्धपुरुष, ज्योतिष्यशास्त्राचे जाणकार, नाडीपट्टीवाचक आणि काही द्रष्टे यांनी ‘वर्ष २०२० ते वर्ष २०२५ हा काळ किती भयावह असणार आहे’, याचे संकेत दिले आहेत.

ईश्वरी नियोजनाप्रमाणे विश्व महायुद्ध होणार असल्याने त्याचा विचार करू नका !

‘या युद्धात कोण जिवंत रहाणार आणि कोण मृत्यूमुखी पडणार ?’, हे कुणी सांगू शकणार नाही.’

आपत्काळ आणि सनातन धर्माची पुनर्स्थापना, यांविषयी विविध संत अन् भविष्यवेत्ते यांनी केलेली भविष्यवाणी

कलियुगांतर्गत कलियुग संपणार असून आता कलियुगांतर्गत सत्ययुग येणार आहे. अधर्माची परिसीमा गाठणार्‍या मनुष्याने स्वतःच्या विनाशाचा मार्ग स्वत:च आखून ठेवला आहे. अधर्माचा नाश होण्यासाठी कोणते तरी महाभारत घडतेच.

कर्नाटकमधील कोडी मठाचे श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र श्री यांची भविष्यवाणी !

कोरोनाचे संकट अजून १० वर्षे रहाणार आहे. २० जून या दिवशी कोरोनाची दुसरील लाट अल्प होणार आहे; मात्र नंतर तिसरी लाट येणार आहे. ती भयानक असणार आहे. लोक कोट्यवधी लोक रस्त्यावर रक्ताच्या उलट्या करून मरतील.

देशाचा राजा कायम राहील; पण ताण वाढेल आणि महामारी अन् आर्थिक संकट येणार !

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रतिवर्षी जिल्ह्यातील भेंडवळ येथे पीक-पाणी, पाऊसमान यांविषयीचा अंदाज वर्तवला जातो. यंदा दळणवळण बंदीमुळे मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत घटमांडणी करून त्यातून झालेल्या हालचालींवरून भविष्यवाणी वर्तवण्यात आली.

रोगराई वाढून आखातात आग लागेल आणि युद्धे होतील !

धान्य भरपूर पिकेल, चोर आणि टोळधाड यांपासून त्रास होईल. रोगराई वाढेल, आखातात आग लागेल. तेलंग देशी (आखाती) आग लागेल. युद्धे होतील, राजकारणी लोकांना त्रास होईल. खरीप आणि रब्बी पिके मुबलक प्रमाणात पिकतील. आश्‍विन आणि कार्तिक मासात देशात अराजकता माजेल, त्याचा जनतेला त्रास होईल, अशी भविष्यवाणी (संवत्सरी) संत गोदड महाराज मंदिरात पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी केली.

गुरु ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे भारतासहित संपूर्ण जगामध्ये युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते ! – ज्योतिर्विद पंडित दिवाकर त्रिपाठी, संचालक, ‘उत्थान’ ज्योतिष संस्थान

येत्या ५ एप्रिल या दिवशी पहाटे ५ वाजता गुरु ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. सध्या मकर राशीत असणारा हा ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. पुढील १३ मास गुरु ग्रह या राशीत रहाणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गुरु ग्रहाचे राशी परिवर्तन ही महत्त्वाची घटना मानली जाते. या परिवर्तनाचा प्रभाव व्यक्ती, समाज आणि देश यांच्यावर होत असतो.

भविष्यामध्ये वातावरण पालट आणि जैविक आतंकवाद यांमुळे लाखो लोकांचा मृत्यू होईल ! – बिल गेट्स यांची चेतावणी

भविष्यामध्ये वातावरण पालट आणि जैविक आतंकवाद या २ गोष्टींमुळे जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू होईल. जगाला संपवण्याच्या उद्देशाने कुणीही नवीन विषाणूची निर्मिती करू शकतो. सध्या जगभरामध्ये चर्चा असणार्‍या कोरोना विषाणूपेक्षा या २ गोष्टींमुळे जगभरामध्ये हाहाःकार उडेल, अशी भविष्यवाणी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी केली आहे.