रोगराई वाढून आखातात आग लागेल आणि युद्धे होतील !
धान्य भरपूर पिकेल, चोर आणि टोळधाड यांपासून त्रास होईल. रोगराई वाढेल, आखातात आग लागेल. तेलंग देशी (आखाती) आग लागेल. युद्धे होतील, राजकारणी लोकांना त्रास होईल. खरीप आणि रब्बी पिके मुबलक प्रमाणात पिकतील. आश्विन आणि कार्तिक मासात देशात अराजकता माजेल, त्याचा जनतेला त्रास होईल, अशी भविष्यवाणी (संवत्सरी) संत गोदड महाराज मंदिरात पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी केली.