समाजातील संतांना सनातन संस्था ‘आपली’ वाटते

परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आणि शिकवण यांमुळे त्यांच्यासारखेच गुण सनातनचे संत आणि साधक यांच्यातही निर्माण झाले आहेत. या गुणांमुळे आता त्यांचेही समाजातील संतांशी आपुलकीचे नातेबंध निर्माण होत आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या उपनेत्राचा (चष्म्याचा) रंग पालटून पिवळसर छटा येणे आणि त्याला अष्टगंधाचा सुगंध येणे यांमागील अध्यात्मशास्त्र !

परात्पर गुरु डॉ. आठवले गेल्या अनेक वर्षांपासून आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करत आहेत. या माध्यमातून विश्‍वाचे कल्याण होणार आहे. त्यांच्याकडून सूक्ष्मातून होत असलेल्या या अद्वितीय कार्याचा स्थुलातील परिणाम त्यांच्या नियमित वापरात असलेल्या वस्तूंवर दिसून येतो. या लेखात सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण देत आहोत.

एकाच कुटुंबातील पाच जणांनी आध्यात्मिक ग्रंथलिखाण करणे – एक अद्वितीय घटना !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कुटुंबातील ते स्वतः धरून पाच जणांनी अध्यात्माच्या विविध विषयांवर लिखाण केले आहे. त्यातील काही लिखाण ग्रंथस्वरूपात प्रकाशित झाले आहे, तर काही लिखाण प्रकाशित होणे बाकी आहे.

साधकांचे आपत्काळात रक्षण होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर कार्यरत असलेले कृपावत्सल परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात केलेले हे कार्य हा केवळ इतिहास नसून साधकांना कलीच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी दिलेला लढा आहे. त्यांतील काही प्रमुख सूत्रेच शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून सत्त्वगुणी सनातन धर्मराज्याची स्थापना होणार !

‘आतापर्यंत सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सनातन संस्थेसाठी २०० पेक्षा अधिक वेळा नाडीवाचन झाले आहे. याखेरीज कौशिक नाडी, भृगु नाडी, शिवनाडी, वसिष्ठ नाडी, काकभुजंड नाडी आणि अत्रि नाडी अशा अनेक ॠषींनी लिहिलेल्या नाडीपट्ट्यांमध्ये सनातन संस्थेचे तीन गुरु, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे श्रीविष्णूचे अवतार असल्याचे आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘श्रीविष्णूची शक्ती’, म्हणजेच श्री महालक्ष्मीच्या अवतार असल्याचे सांगितले आहे.

धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी जन्म झालेले तीन गुरु – परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ !

सनातनच्या तिन्ही गुरूंचा जन्म सूर्यदशेत झाला आहे. तिन्ही गुरु सूर्याप्रमाणे भूत, भविष्य आणि वर्तमान हे तिन्ही काळ जाणतात. जगभर धर्माला आलेली अवकळा दूर करण्यासाठी आणि केवळ सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी त्यांचा जन्म झाला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत उत्तरेकडील भिंतींवर पडलेल्या डागांमध्ये झालेले बुद्धीअगम्य पालट आणि त्यांमागील अध्यात्मशास्त्र !

प्राचीन काळी ऋषिमुनी यज्ञयागादी विधी करत आणि महाबलाढ्य राक्षस त्यात विघ्ने आणत. ऋषिमुनींना जिवे मारत, तसेच गोमांसभक्षण करत. अशा प्रकारे प्रत्येक युगात देवासुर लढा निरंतर चालू असतो, तसाच तो कलियुगातही चालू आहे.

साधकांना साधनाप्रवासात कुठेही अनुभूती वा सिद्धी यांमध्ये अडकू न देता लीलया सगुणातून निर्गुणाकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

मला अचानक स्थुलातून जाणवले की, ‘माझ्या मूलाधारचक्रापासून विशुद्धचक्रापर्यंत ऊर्जाशक्तीचा एक प्रवाह पाठीच्या मणक्यामधून सरळ वरच्या रेषेत गेला आणि तो प्रवाह मानेतच अडकला आहे.’ यापूर्वी मी असे कधी अनुभवले नव्हते. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला आलेली ही अनुभूती ‘कुंडलिनीशक्तीच्या जागृती’ची आहे. हठयोगी, ध्यानयोगी, शक्तीपातयोगी यांच्यासाठी ही उच्च स्तरावरील अनुभूती आहे; पण आपल्याला अशा कोणत्याही शक्तीच्या स्तरावरील अनुभूतींमध्ये अडकायचे नाही.

करुणासागर आणि कृपासिंधू परात्पर गुरु डॉक्टर, आम्ही आपल्या चरणी शतशः कृतज्ञ आहोत !

साधकांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपणारे परात्पर गुरु डॉक्टरांसारखे दुसरे गुरु आज त्रिलोकांत तरी शोधून सापडतील का ? केवळ अशक्य ! यासाठीच परात्पर गुरु डॉक्टरांविषयी अंतःकरणात पुन:पुन्हा हेच शब्द उमटतात, ‘चालविसी हाती धरोनिया ।’

महर्षींनी परात्पर गुरुदेवांचा जन्मोत्सव वैशाख मासाऐवजी चैत्र मासात करण्यास सांगितलेले कारण !

गुरुदेव हे स्वतः श्रीविष्णूचे अवतार असल्याने त्यांच्या अवतारी कार्याविषयीचे मुहूर्त ठरवणारे आम्ही ॠषि-मुनीच आहोत. आताच्या देवलोकातील अवतारी कार्याच्या ग्रहगतीला धरून देवलोकातील पंचांगाप्रमाणे आम्ही सप्तर्षि वैशाख मासाच्या ऐवजी चैत्र मासात जन्मोत्सवाचा मुहूर्त देत आहोत.’’