‘श्रीमद्भगवद्गीता’ या धर्मग्रंथाचे पठण केल्यावर तीव्र आध्यात्मिक त्रास असणारी साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसणारा साधक यांच्यावर झालेला सकारात्मक परिणाम
श्रीमद्भगवद्गीतेमुळे ‘जीवन कसे जगावे आणि कसे जगू नये’, याचे ज्ञान होते. ती वाट चुकलेल्यांना मार्गदर्शन करते आणि दुःखी-कष्टी लोकांना आश्वस्त करते.
