बॉम्बे, औरंगाबाद यांसारखी परकियांची असात्विक नावे पालटून मुंबई, संभाजीनगर यांसारखी भाषा, राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान जपणारी नावे नगरांना देण्याची आवश्यकता स्पष्ट करणारी वैज्ञानिक चाचणी
प्राचीन काळी नगरांची (शहरांची) नावे तेथील ग्रामदेवता, पराक्रमी राजे आदींच्या नावांवर आधारित होती. त्यामुळे नगरांची नावे सात्त्विक होती. जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसतशी भारतावर परकियांची आक्रमणे होऊ लागली. तेथील काही भूभागांवर इस्लामी राजवटीस आरंभ झाला.
