परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अंघोळीसाठी वापरलेल्या ‘मग’मध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण होणे
‘उच्च कोटीच्या संतांनी हाताळलेल्या दैनंदिन उपयोगाच्या निर्जीव वस्तूही त्या संतांमधील सत्त्वगुणाने भारित होऊन पावन होतात. संतांनी हाताळलेल्या वस्तूंचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग होईल.
