वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदीय उपचार

वजन वाढवण्यासाठी प्रतिदिन तेलाने मर्दन करावे, व्यायाम करावा आणि पौष्टिक आहारही घ्यावा. ज्यांना भूक लागत नाही, त्यांनी भूक वाढण्यासाठी औषधे घ्यावीत.

स्थूलपणा (लठ्ठपणा) न्यून करण्यासाठी आयुर्वेदीय उपचार

स्थूलपणा (लठ्ठपणा) न्यून करण्यासाठी प्रतिदिन व्यायाम करावा, औषधांनी मर्दन (मालिश) करावे, योग्य आहार घ्यावा, तसेच औषधेही घ्यावीत. या सर्व स्तरांवर प्रयत्न केल्यास शरिरात साठलेला अनावश्यक मेद (चरबी) न्यून होतो.

त्वचेच्या बुरशी संसर्गावर (‘फंगल इन्फेक्शन’वर) आयुर्वेदाचे उपचार

जांघा, काखा, मांड्या आणि नितंब (कुल्ले) या भागांवर जेथे घामामुळे त्वचा ओली रहाते, तेथे काही वेळा खाज सुटून लहान लहान फोड येतात आणि ते पसरत जाऊन गोलसर चट्टे निर्माण होतात.

गोड पदार्थ जेवणाच्या सुरूवातीला खावे की शेवटी ?

गोड-पदार्थ (स्वीट डिश) हा परदेशात जेवणाच्या शेवटी खाण्याचा प्रकार समजला जातो. बासुंदी, खीर इत्यादी दुधाच्या गोड पदार्थांसह….

अ‍ॅन्टीबायोटिक्स घेत आहात ? पुन्हा एकदा विचार करा !

सेंटर फॉर डिसिज् डायनॅमिक्स इकोनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिसीच्या अहवालानुसार वर्ष २०५० पर्यंत भारतात प्रतिजैविक प्रतिरोध अर्थात् अ‍ॅन्टीबायोटिक्स रेझिस्टन्स मुळे ३० कोटी लोक मृत्यूमुखी पडलेले असतील !

जेवणाच्या वेळा पाळा, आरोग्य मिळवा !

एक आहार पचल्यावरच दुसरा आहार घ्यावा, हा साधा, सोपा आणि सरळ नियम आहे. आहार नीट पचण्यासाठी जेवणाच्या वेळा आयुर्वेदाला अनुसरून हव्यात. या वेळांविषयी दिशादर्शन करणारा हा लेख !

आयुर्वेदानुसार तांब्या-पितळ्याच्या भांड्यांचे महत्त्व

‘तांब्याच्या स्वच्छ भांड्यात २ घंट्यांपेक्षा (तासांपेक्षा) जास्त काळ ठेवलेल्या पाण्याला ‘ताम्रजल’ असे म्हणतात. ‘रसरत्नसमुच्चय’ हा आयुर्वेदातील रसशास्त्र या विषयावरील एक प्रमाणभूत संस्कृत ग्रंथ आहे. याच्या पाचव्या अध्यायातील ४६ व्या श्लोकात तांबे या धातूचे पुढील गुणधर्म दिलेले आहेत.

नेहमी निरोगी रहाण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करा !

आजकाल खोबरेल तेलाविषयी अनेक अपसमज पसरलेले आहेत, उदा. खोबरेल तेल खाल्यास कॉलेस्टेरॉल वाढते. खरे तर, खोबरेल तेल प्रत्येकाने आपल्या समवेत ठेवल्यास दुस-या कोणत्याही औषधाची आवश्यकता भासणार नाही; मात्र हे तेल घाण्यावर काढलेले आणि कच्चे (न तापवलेले) असावे.

हिवाळ्यातील ऋतुचर्या

हिवाळ्यातील थंडीमुळे त्वचेवरील छिद्रे बंद होत असल्याने शरिरातील अग्नी आतल्या आत कोंडला जाऊन जठराग्नी प्रदीप्त होतो. शरिरातील रोगप्रतिकारक क्षमता आणि बळ अग्नीवर अवलंबून असल्याने तीसुद्धा या ऋतूत चांगली असतात; म्हणून हिवाळ्याचे अनुमाने ४ मास (महिने) निसर्गतःच आरोग्य उत्तम रहाते.