गुरुदेवांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’ मुळे होणारी मनोलय आणि बुद्धीलय यांची प्रक्रिया !
‘मन एव मनुष्याणाम् कारणम् बंध मोक्षयोः ।’ या सुवचनानुसार मनच आपले बंधन आणि मोक्ष यांना कारण आहे. या मनाचा निग्रह करून अंतर्मनावरील संस्कार नष्ट केल्यास आपल्याला चैतन्याची, म्हणजेच निजस्वरूपाची जाणीव होते.
