कोवळ्या उन्हात २० मिनिटे बसल्यावर, सौरऊर्जेने तापलेल्या पाण्याने अंघोळ केल्यावर आणि समुद्रकिनारी जाऊन सूर्याला अर्घ्य दिल्यावर कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती !

‘ड’ जीवनसत्त्व वाढण्यासाठी वैद्यांनी साधकांना प्रतिदिन सकाळच्या किंवा सायंकाळच्या कोवळ्या उन्हात २० मिनिटे बसण्यासाठी सांगितले होते. मी सायंकाळच्या उन्हात २० मिनिटे बसते.

स्वभावदोष खूप तीव्र असले, तरी साधनेत प्रगती करता येण्याचे पहिले उदाहरण !

साधकात अनेक तीव्र स्वभावदोष असूनही त्याच्यात भाव, प्रीती, ईश्वरप्राप्तीची तळमळ इत्यादी आध्यात्मिक गुण असले, तर त्याची साधनेत प्रगती होते.

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिका आणि जीवन आनंदी बनवा !

स्वभावदोष आणि अहं हे ईश्वरप्राप्तीसाठीच्या साधनेतील दोन मोठे अडथळे आहेत. स्वभावदोष आणि अहं असला, तर वैयक्तिक जीवनही दुःखी होते आणि व्यक्तीमत्त्वाचा विकासही खुंटतो.

भाव कसा अनुभवाल ?

‘भाव म्हणजे अध्यात्मातील ‘अ’. तो निर्माण होईपर्यंत साधकाची साधना मानसिक स्तरावरची असते आणि निर्माण झाल्यावर आध्यात्मिक स्तरावर चालू होते.’
‘भाव’, म्हणजे दे

मुलांनो, आतापासूनच स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवून ‘व्यक्तीमत्त्व विकास’ साधा आणि गुणसंपन्न होऊन आनंदी जीवनाचीही प्रचीती घ्या !

स्वभावदोष-निर्र्मूलन प्रक्रियेमुळे दोषांवर नियंत्रण येऊन स्वतःमध्ये गुणांचा विकास होतो; म्हणून जीवन सुखी अन् आदर्श बनते.

सनातनच्या साधकाने केलेल्या मार्गदर्शनामुळे कुलदेवीचे नाव कळणे आणि कुलदेवीचे दर्शन घेतल्याने आनंद मिळणे

कुलदेवतेचा नामजप करूनही अपेक्षित लाभ न झाल्याने त्या साधकाने ‘‘तुमची कुलदेवी श्री एकवीरादेवी आहे का ?’’, याची निश्चिती करण्यास सांगितले. त्यांनी आम्हाला तोपर्यंत ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा जप करण्यास सांगितले.

‘अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूची व्याप्ती, अपेक्षांचे प्रमाण अधिक असल्यास त्यामुळे होणारी हानी आणि अपेक्षा न्यून करण्यासाठी उपाय !

‘अपेक्षा करणे’, हा अहंचा एक पैलू आहे. अपेक्षा करतांना स्वतःला अधिक महत्त्व दिले जाते. अपेक्षा इतरांकडून आणि स्वतःकडूनही केल्या जातात.

गुरुदेवांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’ मुळे होणारी मनोलय आणि बुद्धीलय यांची प्रक्रिया !

‘मन एव मनुष्याणाम् कारणम् बंध मोक्षयोः ।’ या सुवचनानुसार मनच आपले बंधन आणि मोक्ष यांना कारण आहे. या मनाचा निग्रह करून अंतर्मनावरील संस्कार नष्ट केल्यास आपल्याला चैतन्याची, म्हणजेच निजस्वरूपाची जाणीव होते.

स्वयंसूचनेच्या संदर्भात टाळावयाच्या चुका

स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेत स्वयंसूचना तयार करणे व स्वयंसूचनेची अभ्याससत्रे करणे, हे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत. यांपैकी एका टप्प्यात जरी चूक झाली, तरी प्रक्रियेचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. त्यामुळे प्रक्रिया अमलात आणूनही माझ्यातील स्वभावदोष का दूर होत नाहीत, असे वाटून नैराश्य येऊ शकते. असे होऊ नये, यासाठी स्वयंसूचनेच्या संदर्भात पुढील चुका टाळाव्यात.   १. स्वयंसूचना देणे टाळून वृत्तीच्या स्तराऐवजी केवळ … Read more