नेपाळमधील पावसामुळे बिहारमध्ये पूर, तर काश्मीर आणि आसामला पुराचा तडाखा !
नेपाळमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारच्या १२ जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. येथे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले. दुसरीकडे ब्रह्मपुत्रा नदीला पूर आल्याने आसामच्या २१ जिल्ह्यांतील १६ लाख लोक बेघर झाले आहेत.
